२७व्या तत्त्वज्ञ संतश्री ज्ञानेश्वर-तुकाराम स्मृती व्याख्यानमालेचे चौथे पुष्प
पुणे, दि. २८ नोव्हेंबर:“ भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने मटेरियल बॉयोटेक्नोलॉजीचा उपयोग करून नॅनो सॅटेलाईटची निर्मिती करत आहे. ज्यामुळे सृष्टीवरील मानवाचे जीवनमान उंचविण्यास मदत होईल. तसेच भारतीय राष्ट्रीय उपग्रह याचे लघुरूप इन्सॅटचा वापर दळणवळण, उपग्रह प्रसारण, हवामानशास्त्र, शोध व इतर कार्याकरिता केला जातो.” असे विचार इस्त्रोचे माजी शास्त्रज्ञ डॉ. भानू पंत यांनी व्यक्त केले.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे, भारत आणि संतश्री ज्ञानेश्वर-संतश्री तुकाराम महाराज स्मृती व्याख्यानमाला न्यास यांच्या संयुक्त विद्यमाने युनेस्को अध्यासना अंतर्गत आयोजित २७वी तत्त्वज्ञ संतश्री ज्ञानेश्वर-तुकाराम स्मृती व्याख्यानमालेत ‘ इस्त्रोः आज आणि उदया’ या विषयावर आयोजित चौथे पुष्प गुंफतांना प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणेचे संस्थापक अध्यक्ष व युनेस्को अध्यासनाचे प्रमुख प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड होते.
तसेच बौद्ध धर्माचे गाढे अभ्यासक राहुल भन्ते बोधी ,एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉ. आर.एम.चिटणीस, प्र कुलगुरू डॉ. तपन पांडा व डॉ. मंदार लेले उपस्थित होते.डॉ.भानू पंत म्हणाले,“ १९६३ पासून सुरू झालेली इस्त्रोची यात्रा २०२२ पर्यंत येऊन पोहचली आहे. इस्त्रोचा मुळ उद्देश अवकाश तंत्रज्ञानाचा विकास करणे व त्याचा उपयोग विविध राष्ट्रीय कार्यात करणे हा आहे. १९६० ते ७० च्या दशकात अग्णिबाण विकास कार्यक्रम पूर्ण केला. १९९८० च्या दशकात उपग्रह प्रेक्षपण यान ३ बनविले आणि अतिप्रगत ध्रुवीय उपग्रह प्रेक्षपण व भूस्थिर उपग्रह यान बनविले. डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या नेतृत्वात भारतीय उपग्रह प्रक्षेपण यानाचे काम १९७० पासून सुरू झाले. ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण यान हे इस्त्रोच्या कामगिरीतला मानाचा तुरा आहे.”
“ इस्त्रोचे गगनयान ही एक उंच भरारी आहे. भारताचा सुदूर संवेदन उपग्रह ही पृथ्वीवरील कोणत्याही ठिकाणाशी संपर्क करणार्या उपग्रहाची मालिका आहे. ओशनसॅट मालिका ही प्रामुख्याने समुद्राचा अभ्यास करण्यासाठी विकसीत करण्यात आला. जी सॅट मालिके अंतर्गत भारताने प्रयोगक्षम भूस्थिर उपग्रह प्रक्षेपित केले आहेत. तसेच भारताची पृथ्वीकडील पहिली मोहिम ही चांद्रयान १ होती, त्यानंतर चांदयान २ ही पूर्ण झाले. ”
प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले,“ मानवाने स्वतःचे खरे स्वरूप ओळखण्याचा प्रयत्न करावा. देह, बुद्धि, आत्मा आणि मनाचे गणित समजून घेणे आवश्यक आहे. ज्या पद्धतीने विज्ञान नॅनो सॅटेलाइटचे संशोधन करीत आहे. त्याच पद्धतीने अति सुक्ष्म आत्म्याचा शोध घेऊन मानवाने सुख, समाधान आणि शांतीसाठी अध्यात्माकडे वाटचाल करावी.”
तत्पूर्वी सकाळच्या सत्रात मुंबई येथील प्रसिद्ध शिक्षणतज्ञ रमेश पानसे यांनी ‘शिक्षणात बदल होतोय’ ’ या विषयावर त्यांनी विचार व्यक्त केले. पुणे येथील प्रसिद्ध हदय रोग तज्ञ डॉ. जगदीश हिरेमठ म्हणाले,“जीवन हे साप शिडीच्या खेळासारखे आहे. म्हणजेच हातात आलेली गोष्ट अचानक निघून जाणे किंवा ज्या गोष्टीची कल्पनाही केली नव्हती ती अचानक मिळणे यालाच आपण नसिबाचे फासे पलटणे किंवा लक असे म्हणून शकतो. कर्मयोग, अॅक्शन आणि दैव योग या सर्व गोष्टी एक मेकांवर अवलंबून आहेत. लक स्वतःच्या बाजूने ओढण्यासाठी खूप परिश्रम करा आणि वेळेचे पालन केल्यास ते शक्य होते.”
प्रा. अरुण माळी यांनी सूत्रसंचालन केले. प्रा.डॉ. तपन पांडा यांनी आभार मानले.