पुणे-पुण्यातून अनेक ठिकाणी लोकांनी आज रात्री ९ वाजता घरातील लाईट बंद करून टॉर्च,दिवे,मेणबत्त्या लावून कोरोना विरोधातील लढयासाठी आत्मीयबल निर्मितीचा प्रयत्न केला .पुणे महापालिकेतील माजी सभागृहनेते श्रीनाथ भिमाले यांनी आपल्या सोसायटीच्या गच्चीत येवून पाहिलेला हा नजारा आणि व्यक्त केलेल्या या भावना ….
कोरोना व्हायरसचा अंधार मिटवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनानंतर देशातील नागरिकांनी आज(रविवार) रात्री 9 वाजता 9 मिनीटांसाठी घराच्या सर्व लाइट बंद करुन, दिवे, मेणबत्ती, टॉर्च आणि मोबाईलचा फ्लॅश लावून अंधारावर मात केली. पंतप्रधानांनी लोकांना लक्षात राहावे म्हणून, रविवारी एक ट्वीटदेखील केले होते. यापूर्वी मोदींनी कोरोना संकटावर आपल्या तिसऱ्या संबोधनात म्हटले होते की, आपल्याला 5 एप्रिलला आपल्या महाशक्तिला जागे करायचे आहे
कोरोना संकटावर मोदींनी शुक्रवारी आपल्या तिसऱ्या संबोधनामध्ये 5 एप्रिलला सर्व लाइट बंद ठेवून दिवे, मेणबत्त्या किंवा मोबाइलचा फ्लॅश लावण्याचे आवाहन केले होते. ते म्हणाले होते की, “आपल्याला प्रकाशाची शक्ती दाखवायची आहे. रविवारी 130 कोटी देशवासीयांनी महाशक्ती दाखवायला हवी. घराच्या सर्व लाइट बंद करा आणि घराच्या बालकनी, खिडकी, किंवा छतावर येवून दिवे, मेणबत्त्या, टॉर्च किंवा मोबाइलचा फ्लॅश लावावा. यामुळे घरात असलेल्या लोकांना एकटे वाटणार नाहीत. यादरम्यान सोशल डिस्टंसींगचे पालनही करावे.”