एमआयटी डब्ल्यूपीयू स्कूल ऑफ बिजनेस (चाणक्य)इमारतीचे उद्घाटन
पुणे, दि. २ फेब्रुवारी:“ भारतीय उच्च शिक्षण पद्धतीत सुधारणा केल्यास हा देश लवकरच जागतिक शैक्षणिक केंद्र बनेल. तसेच देशातील सर्व विद्यापीठांनी आपल्या कल्याणकारी योजना गरीब आणि वंचितांपर्यत पोहचविण्यासाठी गांवे दत्तक घेऊन त्या गावाचा शैक्षणिक विकास करावा.”असे विचार उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी केले.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे तर्फे नव्याने उभारण्यात आलेल्या एमआयटी डब्ल्यूपीयू स्कूल ऑफ बिजनेस (चाणक्य)इमारतीचे उद्घाटन राज्यपाल आनंदीबेन पटेल यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी एमसीसीआयएचे अध्यक्ष दीपक करंदीकर, महासंचालक प्र्रशांत गिरबाने आणि आरएफआयडी आयटेकचे सीईओ असिम पाटील हे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित होते. एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड हे अध्यक्ष स्थानी होते.
तसेच, एमआयटी वर्ल्ड पीस युुनिव्हसिटीचे कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड, कुलगुरू डॉ. आर.एम. चिटणीस, प्र कुलगुरू डॉ. तपण पांडा आणि प्रवीण पाटील उपस्थित होतेेेेे.
आनंदीबेन पटेल म्हणाल्या,“ राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे शिक्षण व्यवस्था अधिक स्पर्धात्मक होईल. उच्च शिक्षणात सुधारणा केल्या तर भारत महासत्ता बनेल. विद्यार्थ्यांनी समाजातील संधी आणि आव्हाने समजून घेऊन नाविण्यपूर्ण उपाय उपलब्ध करून दिले पाहिजेत. तसेच विद्यार्थी शिक्षीत व जाणकार झाल्यामुळे भारत लवकरच जागतिक शैक्षणिक गंतव्यवस्था बनेल. आपल्या शैक्षणिक संस्थांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या बरोबरीने आणण्याची गरज आहे.”
“स्वदेशी उत्पादने आणि त्यांची रचना बनविण्याचे पारंपारिक कौशल्य ओळखले पाहिजे. सरकारच्या विविध कल्याणकारी योजना समाजातील गरीबांपर्यत पोहचतील यासाठी विद्यार्थी आणि विद्यापीठांनी सक्र्रिय सहभाग घ्यावा.”
डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले,“ विद्यापीठाचे ध्येय म्हणजे जीवन परिवर्तन आहे. त्यामुळे सामाजिक बांधिलकीची भावना विद्यार्थ्याामध्ये रुजविण्याचे कार्य सतत सुरू आहे. विद्यार्थ्यांनमध्ये शिस्त आणि चारित्र्य असणे गरजेचे आहे. त्या मुळे जीवनाला नवी दिशा मिळते.”
राहुल विश्वनाथ कराड म्हणाले,“अध्यात्म आणि विज्ञानाच्या समन्वयातून विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यांचा पायंडा डब्ल्यूपीयूने घातला आहे. व्यवस्थापन क्षेत्रातील नवनर्मित या वास्तूमध्ये विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे ज्ञान दिले जाणार आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच येथे सामाजिक कार्याचे धडे शिकविले जाते.”
दीपक करंदीकर म्हणाले, “शिक्षण संस्थांनी उद्योग, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांशी अधिक जोडले पाहिजे. या उपक्रमाला फॅकल्टी मेंबर्स आणि विद्यार्थ्यांना फायदा होईल आणि उद्योगांना समस्या सोडवण्यासाठी हात आणि बुद्धि मिळेल. विद्यार्थ्यांना व्यवसाय ऑपरेशन्सचे तंत्रज्ञान, वित्त, नियामक अनुपालन आणि स्वदेशीकरण या बाबी समजून घेतल्यास रोजगारक्षम होतील. ”
प्रशांत गिरबाने म्हणाले,“आपल्याला कुठे जायचे आहे हे आपण ओळखावे. विद्यार्थ्यांनी चांगला अभ्यास केला पाहिजे. कठोर परिश्रम केले पाहिजे आणि आपली टीम, संस्था व समाजासाठी काय करता येईल यावर लक्ष द्यावे.”
असीम पाटील म्हणाले,“व्यवस्थापन क्षेत्रातील विद्यार्थ्यांनी सामाजिक आंत्रप्रेन्यूअरशीप मध्ये कार्य करावे.”
डॉ. आर.एम.चिटणीस यांनी स्वागतपर भाषण केले.
प्रा.डॉ. गौतम बापट यांनी सूत्रसंचालन केले. प्रा.डॉ. तपण पांडा यांनी आभार मानले.