कलाकार कट्टा चळवळीसाठी ? कलेसाठी ? कि गोंधळ घालण्यासाठी ? पोलिस संभ्रमात ?
पुणे -शेवटच्या तीन ओव्हरमध्ये भारतीयांच्या हृदयाचे ठोके वाढत होते. सामन्यात एक ना एक चेंडू महत्वाचा होता. विराटच्या सुसाट बॅटने विजयाला भारताकडे ओढवून आणले. अखेर भारताने पाकिस्तानवर मात करून विजयाची पताका भारतीयांच्या मनात रोवली. त्यानंतर देशात सर्वत्र जलोष सुरु झाला. पुण्यातल्या गुडलक चौकात तरुणाईने भारत मात कि जय, वंदे मातरम चा जयघोष करत विजयी जल्लोष साजरा केला.आनंदोत्सव म्हणा किंवा विजयोत्सव साजरा होताना दिसत आहे. पुण्यातील एफसी रोडवर प्रारंभीच असलेल्या गुडलक चौकात कलाकार कट्टा साकारण्यात आला आहे. नावावरून तो कलाकारांसाठी त्यांच्या कलेच्या सादरीकरणासाठी किंवा कलाकार जिथून उपलब्ध होऊ शकत असतो अशा स्वरूपाचा कलाकार कट्टा असेल, किंवा सामाजिक चळवळीचे स्थान असू शकेल अशी भावना झाली असेलही पण नंतर हा कट्टा राजकीय आंदोलनाचे आणि शक्ती स्थळाचे स्थान बनू लागला कि काय ? असे वाटू लागले आता तर भारताने पाकला हरविल्यावर आनंदोत्सव करण्यासाठी तो एक चांगले स्थळ बनल्याचे दिसले . आनंदोत्सव मात्र जेव्हा वाहतूक कोंडीचा आणि गर्दी गोंधळाचा जल्लोष म्हणता म्हणता उन्माद बनू पाहील तेव्हा मात्र कठीण होईल अशी काळजी आज पोलिसांना हुलकावणी देऊन गेली .
भारतीय संघाच्या विजयाचा आनंद व्यक्त करण्यासाठी मोठी गर्दी येथे ए कवटल्याचे दिसून आले.एफसी रोडवर मोठ्या प्रमाणात तरुणाईचा जल्लोष दिसून आला. यामध्ये गुडलक चौकात तर भारत माता की जय, जय भवानी जय शिवाजी अशा घोषणांनी आसमंत दुमदुमन निघाल्याचे दिसून आले आहे. बराचवेळ एफसी रस्त्यावर वाहतूक कोंडी झाल्याचे पाहवयास मिळाले. अखेरीस पोलिसांना हा आनंदोत्सव हस्तक्षेप करून थांबवावा लागला.