पुणे-सत्तेसाठी भाजपवासी झालेले काँग्रेसचे दिग्गज नेते आणि माजी कॅबिनेट मंत्री हर्षवर्धन पाटील यांचा इंदापुरातून दारुण पराभव झाला आहे. त्यांचा सलग दुसऱ्यांदा पराभव झालाआहे. हर्षवर्धन पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांना मंत्रीपद देण्याचे सुतोवाचही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते, पण आता त्यांचा पराभव झाला आहे.
इंदापुरातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या दत्ता भरणे यांनी हर्षवर्धन पाटील यांचा पराभव केला. राज्यातील तब्बल २० आयारामांना जनतेने घरचा रस्ता दाखवला आहे.निवडणूकपूर्व तसेच निवडणुकोत्तर चाचण्यांना फोल ठरवत महाराष्ट्र जनेतेने निकाल दिला आहे.सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या गृहित धरण्याच्या राजकारणाला पूर्णपणे लाथाडले असल्याचे स्पष्ट जाणवत आहे. मतमोजणी संपूर्ण पार पडली नसली, तरी भाजपची शंभरीच्या आसपासच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे हा निकाल सर्वांनाच चकीत करणारा आहे.
निवडणुकीत कलम ३७० चा ज्यापद्धतीने मारा करण्यात आला. तसाच तेल लावलेला पैलवान कोण? राज्य सहकारी बँ केतील घोटाळ्यानंतर जो ईडीचा खेळ झाला त्यावरूनही बरेच राजकारण तापले. राष्ट्रवादीचे दस्तुरखुद्द शरद पवार यांनाच ईडीकडून नोटीस आल्यानंतर राज्यातील वातावरण पूर्णतः ढवळून निघाले.