पुण्यातील कोरोनाच्या थैमानाला कोण जबाबदार ? असा अप्रत्यक्ष सवाल संसदेतही खा. बापटांनी उपस्थित करत पुण्यात आता केंद्र सरकारने लक्ष घातले पाहिजे अशी मागणी केली.
राज्य सरकारने दिलेले २० आय ए एस अधिकाऱ्यांमधील असमनव्यय -पुण्यातील परिस्थितीला जबाबदार असून त्यामुळे भीतीचे वातावरण तयार झाले आहे . ..आता केंद्राने टास्क फोर्स पाठवावा ….असे ते म्ह णाले
भाजपा चे पुण्यातील खासदार गिरीश बापट यांनी पुणे शहर व पुणे जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी काल संसदेत टास्क फोर्स पाठवण्याची, तसेच व्हेंटिलेटर, रुग्णवाहिका व ऑक्सिजन बेड कमी असून ते आवश्यक प्रमाणात त्वरीत मिळण्याबाबत केंद्रशासनाचे लक्ष वेधून मागणी केली.