पुणे – शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आमच्यासोबत विश्वासघात केला आहे. शिवसेनेने 2019 विधानसभा निवडणुकीत आमच्यासोबत विश्वासघात केला. आमच्यामुळेच त्यांच्या जागा निवडणून आल्या. आता त्यांच्यातर हिंमत असेल तर त्यांनी राजीनामा द्यावा.हिंमत असेल तर येणाऱ्या निवडणुकांमध्ये तिन्ही पक्षांनी एकत्र लढावे. असे आव्हान देखील आज येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारला दिले आहे. पुणे महापालिकेच्या निवडणुकीपूर्वी अमित शहांनी राज्य सरकारला खुले चॅलेंज केले असून, एकाप्रकारे शहांनी प्रचाराची सुरुवात केल्याचे पाहायला मिळत आहे.
शहा सध्या पुणे दौऱ्यावर असून, यावेळी त्यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर देखील जोरदार निशाणा साधला..पुणे देशाला दिशा दाखवणारेपुणे हे देशाला दिशा दाखवणारे शहर आहे. असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री मंत्री अमित शहा यांनी केले आहे. शहा सध्या पुणे दौऱ्यावर असून, आज त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची पायाभरणी केली. छत्रपती शिवाजी महाराजांचे पाय या पवित्र भूमिला लागले आहेत. लोकमान्य टिळक पुण्यात वास्तव्य करत होते. मी महापालिकेत गेलो होतो तिथे मी महात्मा फुलेंच्या प्रतिमेला अभिवादन केले. देशाला दिशा देण्याचे काम या शहराने केले आहे. पुणे ही महान व्यक्तिमत्त्वाची भूमी आहे. ज्या सगळ्यांनी देशाला दिशा दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सात वर्षात देशाची प्रगती केली. त्यांनी परिवर्तनाची लाट या देशात आणली. असे अमित शहा म्हणाले.नरेंद्र मोदींच्या आधी दहा वर्षे काँग्रेसचे सरकार होते. सोनिया गांधी आणि मौनीबाबा सत्तेत होते. देशावर हल्ले झाले, काहीही झाले तरीही मौनीबाबा काहीच बोलत नसत. मोदी सत्तेत आल्यानंतर जेव्हा उरी आणि पुलवामा हल्ला झाला तेव्हा पाकिस्तानला आपण घरात घुसून उत्तर दिले आहे. त्यामुळे पाकिस्तानला कळले आहे की, भारतात काँग्रेसचे सरकार नाही. आपण जर कुरापती काढल्या तर आपल्याला उत्तर मिळणार ते पाकिस्तानला कळले.भारतीय जनसंघाचे बीज ज्यांनी लावले त्यांना हे माहित होते की, उद्या याचा वटवृक्ष होणार आहे. त्याचाच परिणाम आपण आज पाहत आहोत. आज भाजप हा जगातला सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. पार्टीचे भविष्य हे कार्यकर्ते आहेत. या पक्षाने कार्यकर्त्यांनाच कायम मोठे केले आहे. त्याचे उदाहरण मी आहे. मी चटाया पसरवणारा कार्यकर्ता होतो. पक्षात जो मागत राहतो त्याला काहीच मिळत नाही पण जो मागत नाही त्याला कधी काही कमी पडत नाही. असे म्हणत अमित शहांनी आपल्या पक्षाची वाहवाही केली.
या महाविकास आघाडी सरकारच्या पतनाची सुरवात पुणे महापालिकेच्या निवडणुकीतून होईल, असा इशाराही शहा यांनी दिली. नरेंद्र मोदी यांनी पेट्रोल आणि-डिझेलचे दर कमी केले. महाराष्ट्र सरकारने मात्र, दारुचे दर कमी केले. आम्ही दारुचे नाहीत तर पेट्रोल-डिझेलचे दर कमी करण्यास सांगितले होते, असा चिमटा शहा यांनी काढला. या सरकारचे दोनच लक्ष्य आहे. एक वसुली आणि दुसरे राजकारणाचे गुन्हेगारी करणे. विधानसभा निवडणुकीमध्ये आमच्या सोबत जे झाले ते बदलायचे असेल तर पुण्यामधून त्याची सुरुवात करावी लागेल, असेही शहा म्हणाले. शिवसेनेने विधानसभा निवडणूक पंतप्रधान नरेंद मोदी यांचे नाव घेऊन लढवली. त्या निवडणुकीत एनडीएला बहुमत मिळाले. मात्र, शिवसेनेने सत्तेसाठी गद्दारी केली, असा आरोप शहा यांनी केला. विश्वासघात करुन सत्तेवर बसले. महाराष्ट्राचे आघाडी सरकार म्हणजे तीन पायांची ऑटो रिक्षा आहे. त्यांचे तीनही चाके वेगवेगळ्या दिशांना आहेत आणि ते चाके पंच्चर आहेत. त्यामुळे हे सरकार महाराष्ट्राचा विकास करु शकत नाही, असेही शहा म्हणाले.
महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारच्या पतनाची सुरुवात पुणे महापालिकेच्या निकालानं व्हायला हवी. लक्ष्य कधी कमी ठेऊ नका मित्रांनो. मी ऐकत होतो कोणी १०० तर कोणी १२० नगरसेवक असं म्हणतं होतं. पण जनता तुम्हाला जास्त नगरसेवक द्यायला बसली आहे, त्यामुळं मागण्यात कंजुषी करु नका. पुण्याची जनता फुलानं तुमचं स्वागत करायला तयार आहे. परिश्रम करा हे आपोआप होईल, दरम्यान, भारतीय जनता पक्ष हा सर्व सामान्य कार्यकर्त्यांना संधी देणारी संधी आहे, मी सुद्धा एक बुथ प्रमुख म्हणून काम केलं होतं, त्यानंतर पक्षाने मला थेट अध्यक्ष होण्याची संधी दिली असं म्हणत त्यांनी कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम केलं.