मेट्रो मध्ये ८० टक्के भूमिपुत्रांना नौकरी द्यावी लागेल, अन्यथा ….
पुणे – शिवसैनिकांच्या आग्रहाखातर गणेशोत्सवासाठी खासदार संजय राऊत पुढील आठवडयात पुण्यात येणार असून त्यांना कोणी आडवे आले तर त्यास आम्ही आडवे करू असा सज्जड इशारा शिवसेनेच्या वतीने देण्यात आला.शिवसेनेचे गटनेते पृथ्वीराज सुतार, शहर प्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे यांनी दिला आहे. नगरसेवक विशाल धनवडे, बाळा ओसवाल, नगरसेविका संगीता ठोसर, पल्लवी जावळे यांनी संयुक्त पाने घेतलेल्या पत्रकार परिषदेतून हा इशारा दिला .
खासदार राऊत यांनी केलेल्या व्यक्त्याव्या विरोधात शहर भाजपच्या वतीने पोलीसात तक्रार देण्यात आली असून खासदार राऊत यांनी या व्यक्तव्या प्रकरणी माफी मागावी अशी मागणी करत खासदर राऊत यांना पुण्यात फिरकू देणार नसल्याचा इशारा भाजपचे शहराध्यक्ष जगदिश मुळीक यांनी दिला होता.त्याचा खरपूस समाचार शहर शिवसेनेने घेत, मुळीक यांनी आधी शहराची हद्द जाणून घ्यावी मग स्वत:च्या हद्दीत राहून स्वत:च्या पायावर आधी उभे रहावे असा इशारा
सुतार म्हणाले की, खासदार संजय राऊत यांना शिवसैनिकांनी पुण्यात येण्याचे निमंत्र दिले असून त्यांनी ते स्विकारले आहेत, त्यानुसार, गणेशोत्सवात ते पुण्यात येत आहेत. त्यांना कुणीही अडवूनच दाखवावे असा इशारा दिला, तर थरकुडे यांनी त्यांना अडचिण्याचा प्रयत्न झाल्यास संबधितांचे स्वागत शिवसेना स्टाईलने केले जाईल अशा शब्दात टिका केली. तर मुळीक यांनी आधी शहराची हद्द समजून घ्यावी, स्वत:च्या पायावर उभे रहावे मग आम्हाला इशारा द्यावा अशी टिका नगरसेवक ओसवाल यांनी केली.
भाजपने 11 गावात हेच केले का ?
या वेळी शिवसेना शहराध्यक्ष मोरे यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावरही जोरदार टिका केली. प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी नुकतेच 23 गावे आघाडी सरकारने जागा हडपण्यासाठीच घेतली असल्याची टिका केली होती. त्यावर, उत्तर देताना मोरे यांनी 11 गावांमध्ये भाजप आणि प्रदेशाध्यक्ष पाटील हेच उद्योग करत होते का असा सवाल उपस्थित केला आहे. ही गावे घेताना भाजपने काय काय केले हे सर्वांना माहित असून आता आपल्याकडे काहीच राहिले नसल्याचे दिसताच अशी टिका केली जात असल्याचे मोरे म्हणाले.
मेट्रो मध्ये ८० टक्के भूमिपुत्रांना नौकरी द्यावी लागेल
संजय मोरे, विशाल धनवडे ,बाळा ओसवाल आणि पृथ्वीराज सुतार यावेळी म्हणाले कि , मेट्रो आता नौकर भारती करेल त्यात ८० टक्के नौकरी भूमिपुत्रांना द्यावी लागेल .त्यासाठी तेवढ्या जागा त्यांनी राखून ठेवाव्यात. यासाठी आम्ही नगरविकास मंत्री यांना साकडे घातले आहेच .आणि ते त्यांनीही मान्य केले आहे. त्याची काटेकोर अंमलबजावणी मेट्रोच्या अधिकार्यांना करावी लागेल ते ती करतात कि नाही यावर आम्ही बारकाईने लक्ष ठेवू .
सर्वसामान्यांची घरे गुंठेवारी पद्धतीने नियामान्वित करावीत , मनपा कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगा नुसार वेतन द्यावे , आणि ६ मीटर रुंदीच्या रस्त्यांवर टीडीआर देण्यास प्रारंभ करावा अशा हि मागण्या आम्ही नगर विकास मंत्री यांच्याकडे केल्या असून त्यांनी त्यास संमती दिली आहे . महापालिका अधिकाऱ्यांनी त्याची अंमलबजावणी केली पाहिजे यासाठी आम्ही लक्ष ठेवून राहू .