पुणे – महापालिकेत राज्य सरकारने आयुक्तांपासून काही पदांवर आय ए एस अधिकारी नियुक्त केले आहेत. महापालिकेतील कंत्राटी कामगारांवरील आर्थिक अत्याचार असू द्यात,पुणेकरांच्या आरोग्याची समस्या असू द्यात हे अधिकारी करतात काय ? मुलाखती देऊन मिरवितात,समस्या आल्या कि कनिष्ठांना अहवाल द्या म्हणून आदेश सोडून मोकळे होतात असाच काहीसा अनुभव आता पुण्याची तुंबई झाल्यावर देखील येतो आहे.थोडक्यात काय मराठीतच सांगायचे झाले तर.हवा गेली सरून..आणि आता..धरला आवळून..अशी काही तरी म्हण आहे,घटना घडण्या पूर्वी या अधिकाऱ्यांनी काय नुसत्या खुर्च्या गरम करून ताव मारले कि काय ? असा प्रश्न कोणीही उपस्थित करेल अशी स्थिती आहे. काही झाले तरी मूळ इथले अधिकारी बळी द्यायचे आणि यांनी येऊन मस्त भेळ खाऊन दौरे मारून उंटावरून निघून जायचे अशीच स्थिती महापालिकेत वारंवार दिसून आली आहे.
पुण्याची तुंबई झाल्यावर एका आय ए एस अधिकाऱ्याने महापालिकेने नालेसफाई निकृष्ट पद्धतीने केल्याने शहरात पाणी तुंबले,पण त्याचसोबत बांधकाम विभागाच्या आशीर्वादाने बांधकाम व्यावसायिकांनी त्यांना हवे तसे नाले वळविले मत नोंदवून जबाबदारी झटकून टाकली आहे. त्यामुळे बांधकाम विभागाने शहरातील नाल्यांची स्थिती, अतिक्रमण झालेले नाले, बेकायदा बांधकाम झालेले नाले याचा अहवाल सोमवारी सादर करावा असे आदेश त्यांनी दिल्याचे वृत्त आहे.शहर आणि परिसरात रविवारी मुसळधार पाऊस झाला. शहराच्या सर्वच भागात मोठ्याप्रमाणात पाणी तुंबले. त्याचसोबत पाणी वाहून जाण्यासाठी जागा नसल्याने.रस्त्यावरून पाणी वेगात वाहू लागले. काही ठिकाणी सोसायटीच्या सीमाभिंती पडल्या, पण सुदैवाने त्यात कोणालाही दुखापत झाली नाही.वारंवार पुराचे दर वर्षी इशारे देणाऱ्या लोकप्रतिनिधींना,माध्यमांना आम्ही दक्षता घेतो आहे असे पावसाळ्यापूर्वी सांगणारे हे अधिकारी पूर आल्यावर नंतर पाहणी करतात आणि काही ठिकाणी पाणी साचण्याचे ठिकाण, तेथे वाहून जाण्यासाठीची व्यवस्था काय आहे याचा आढावा घेतात,आणि कनिष्ठांना अहवाल द्यायचे आदेश देऊन मोकळे होतात,सारेच अजब आहे.त्यानंतर तेथे त्वरित आवश्यक असलेली कामे करणे आणि दीर्घकालीन कामे केली जाणार आहेत. नाल्यांमधील अतिक्रमण, नाले वळविणे, रुंदी कमी करणे असे प्रकारही निदर्शनास आल्याचे सांगून अनेक नागरिकांकडून याबाबत तक्रारी आलेल्या आहेत असे वक्तव्य करतात म्हणजे आता किती बनवा बनवी करायची याला काही मर्यादाच राहिलेली नाही. पाऊस १ /२ तास जोरदार झाला रात्रभर झाला असता तर..अशा आय ए एस अधिकाऱ्यांच्या तातडीने बदल्या करून त्यांच्या जागेवर कार्यक्षम अधिकारी नियुक्त करावेत अशी मागणी आता होऊ लागली आहे.