मी रसिकांच्या ऋणातच राहणे पसंत करेल :- जेष्ठ सिने-नाट्य अभिनेते स्वरुपकुमार
पुणेः- आमच्या क्षेत्रात रसिकांना मायबाप संबोधले जाते, हे संबोधन वास्तव असून मी व्यक्ति: रसिकांच्या ऋणातच राहणे पसंत करेल असे विचार जेष्ठ सिने-नाट्य अभिनेते स्वरुपकुमार उर्फ अनंत प्रभाकर मेहंदळे यांनी व्यक्त केले.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या कोथरुड शाखेतर्फे यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाचा २२ वा वर्धापन दिन आणि स्व.यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीदिनानिमित्त आज यशवंत-वेणू पुरस्काराने जेष्ठ सिने-नाट्य अभिनेते स्वरुपकुमार उर्फ अनंत प्रभाकर मेहंदळे आणि सुषमा अनंत मेहंदळे यांना देण्यात आला त्यावेळी स्वरुपकुमार बोलत होते .
यावेळी व्यासपीठावर पुणे महानगर पालिकेतील शिवसेनेचे माजी गटनेते पृथ्वीराज सुतार, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष सुनील महाजन, सत्यजित धांडेकर, समीर हंपी, प्रवीण बर्वे, दिपक रेगे, दीपक गुप्ते, दिपक पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
ज्येष्ठ सिने-नाट्य अभिनेत्री सुहासिनी देशपांडे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी रंगभूमीवरील विशेष योगदानाबद्दल अशोक कुलकर्णी यांचा सत्कार करण्यात आला.
स्वरुपकुमार त्यांच्या मनोगतात म्हणाले , मला किर्लोस्कर मध्ये चांगल्या पगाराची नोकरी होती. बायकोशी विचार विनिमय करून नोकरी सोडून पूर्णवेळ रंगभुमीची सेवा करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयावर रसिक मायबापांनी पश्याताप होऊ दिला नाही. बाबूराव गोखले यांच्या स्वयंसिद्धा या पहिल्या व्यवसाईक नाटकांत काम केले आणि नं ता मागे वळून पाहिले नाही. मला सिनेमासुष्टीतील मोठमोठ्या बॅनरखाली काम करण्या साठी बोलवणे होते परंतू सिनेमा पेक्षा रंगभुमी मला सदाबहार आणि जिवंत वाटली त्यामुळे मी त्या ऑफर्रस स्विकारल्या नाही.
सुहासिनी देशपांडे त्यांच्या मनोगतात म्हणाल्या , मी 1972 साली स्वरूपकुमार यांच्या सोबत सून बाई घर तुझेच आहे या नाटकापासून जोडलेली आहे. सुमारे 50 वर्षाहून ही अधिक काळ आम्ही सोबत काम केले. कुर्यात सदा टिंगलम , सासू बाईंचे असेच असते अश्या नाटकांची हजारो प्रयोग आम्ही महाराष्ट्रभर केली.
यावेळी दिपक रेगे यांनी त्यांच्या मनोगतातून स्वरूप कुमार यांचे व्यक्तिमत्व उलगतले.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष सुनील महाजन यांनी प्रास्ताविक केले.
पुरस्कार वितरण सोहळ्या नंतर डी.एस.पी. प्रॉडक्शन प्रस्तुत ‘सूर तेच छेडिता…’ हा कार्यक्रम गायक जितेंद्र भुरुक, रविंद्र शाळु, श्रीपाद देशपांडे, राधिका अत्रे, पल्लवी आनदेव आणि स्नेहल आपटे यांनी सादर केला.