पुणे -कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू झालेल्या लॉकडाउनच्या काळात एकीकडे मदतीचे हाथ पुढे होत असताना दुसरीकडे नफेखोरी करत किराणा, चिकन, मटन आणि सलून दुकानदार यांनी आधीच नोकरी च्या ,पगाराच्या चिंतेने हैरान झालेल्या, व्यवसाय ठप्प झालेल्या मध्यमवर्गीयाची मोठी लूट शहरात केल्याचे दिसून आले आहे.दुर्दैवाने शासकीय स्तरावर याबाबत म्हणावी तशी 99 टक्के हालचाल दिसून आली नाही.
वेगवेगळी कारणे पुढे करत अत्यावश्यक वस्तू आणि किराणा चढ्या भावाने विकला जात असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. एमआरपीपेक्षा जास्त किंमत मोजावी लागल्याचा आक्षेप ७१ टक्के ग्राहकांनी नोंदवला आहे.
मूळ उत्पादकांनी वस्तूंच्या किंमतींमध्ये वाढ केलेली नाही. कमिशनही घटवलेले नाही, तरीही किरकोळ व्यापाऱ्यांनी सवलती रद्द करून जास्त दराने विक्री केल्याचे त्यांचे म्हणणे आहे. अवघ्या २५ टक्के ग्राहकांनी मूळ किंमतीत वस्तू मिळाल्याचे म्हटले आहे. वस्तू घरपोच देणे, मजुरांची टंचाई, हमाली, वाहतुकीचा वाढलेला खर्च अशी कारण देत चढा भाव लावल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे.