सारं कुटुंब रमलं सेवेत -२००० गरजूंना दिले दम बिर्याणीचे घरपोहोच भोजन
पुणे- केवळ स्वतः ,कार्यकर्तेच नव्हे तर पत्नी ,मुले, नातवंड सुना , भाचे मामा अशा साऱ्यांनी एकत्र येऊन कॉरोनाच्या काळात ..साथी हाथ बढाना …चा संदेश देत कॉंगेस नेते आबा बागुल आणि सौ जयश्री आबा बागुल यांच्या लग्नाचा ४१ वा वाढदिवस साजरा केला. या एकत्रित कुटुंबाने आणि त्यांच्या नातलगांनी एकत्र येत स्वतः दम बिर्याणी बनवून ती कोरोना ग्रस्तांसाठी आणि अन्य गरजूंसाठी सकस आहार घरपोहोच दिली
जेष्ठ नगरसेवक आणि पुणे महानगरपालिकेतील काँगेस पक्षाचे गटनेते आबा बागुल व पत्नी सौ जयश्री बागुल यांच्या लग्नाचा ४१ वा वाढदिवस ! गेले १८ दिवस आबा बागुलांच्या पुढाकाराने कोरोना काळात परिसरातील गरीब व गरजु २००० व्यक्तींना विनामूल्य घरपोच जेवणाचे डबे पोहोच केले जात आहेत. यामध्ये गरीब, हातगाडीवाले, फेरीवाले,रिक्षावाले व हातावरचे पोट असलेल्या अश्या २००० नागरिकांना रोज डबा पोहोच केला जातो. गेले 18 दिवस झाले हा उपक्रम सुरू आहे. आज पर्यत 36000 जेवण वितरित करण्यात आले आहे .त्यांच्या लग्नाचा आज १२ मे २०२१ रोजी ४१ वा वाढदिवस असून हा वाढदिवस आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करण्याच्या कल्पनेतून २००० व्यक्तींचे जेवण स्वतः स्वयंपाकात सहभागी होऊन केला.. व कार्यकर्त्यांच्या मदतीने डबे गरजू २००० लोकांच्या घरी दुपारी 12 ते 2 या वेळेत पोहोच केले.. शिवदर्शन येथील राजीव गांधी इ लार्निग येथे सकाळी हा सारा स्वयंपाक इथे झाला .यावेळी आनंदी रहा ,एकमेकांची काळजी घ्या , नियम पाळा असा कोरोना मुक्तीचा मंत्र हि यावेळी बोलता बोलता या दाम्पत्याने दिला .
आबा बागुल व बागूल कुटुंबीयांतर्फे दरवर्षी विनामूल्य काशी यात्रेचे आयोजन केले जाते. गेल्या 17 वर्षात 26 वेळा विनामूल्य काशी यात्रा झाली त्यातील प्रत्येक वेळी वाराणसी (काशी) येथे सुमारे 2000 वयोवृद्ध माता पिता भाविकांसाठी आबा बागुल व त्यांची पत्नी सौ जयश्री बागूल स्वतःच्या हाताने 2000 व्यक्तींचा स्वयंपाक करून भाविकांना जेवण देतात .