पुणे- भाजपचे ज्येष्ठ नेते आणि पुण्याचे खासदार गिरीश बापट यांनी पाण्यासाठी गेल्या २६ मार्चला महापालिकेवर उगारलेले अस्त्र असो कि माजी आमदार ,भाजपचे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांनी पाण्याच्या समस्येसह अन्य प्रश्नांवर अवघ्या २/३ दिवसांपुर्वी महापालिका आयुक्तांचे दालन गाठलेले असो या पक्षाच्या दोन्ही जनहितासाठीच्या अॅॅकटीव्हीटींंकडे; तब्बल ५ वर्षे महापालिकेत पदाधिकारी राहिलेले, मुरलीधर मोहोळ आणि त्याखालोखाल सुमारे अडीच वर्षे स्थायी समिती अध्यक्ष राहिलेले हेमंत रासने या दोहोंनी पाठ फिरविल्याने, पक्षाने बलशाली बनविलेले हे दोन्ही माजी पदाधिकारी पक्षांतर्गत वादाच्या भोवऱ्यात सापडू शकणार आहेत असे सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार समजते आहे.
मितभाषी मोहोळांना नेहमीच सांस्कृतिक कार्यक्रमांचे वेध लागलेले असतात, ते विविध ठिकाणी अशाच स्वतंत्र पद्धतीने आयोजित कार्यक्रमांत दिसतात,पण प्रत्यक्षात ते पक्षाच्या कोणत्याही कार्यकर्त्यांची कामे करतात असे वाटत नाही तर रासने कधी कुठे फिरकतच नाहीत अशा स्थितीत या दोहोंकडून शहरातील आणि उपनगरांमधील जनहित ,कार्यकर्त्यांच्या अडचणी याकडे साफ आणि सर्रास दुर्लक्ष झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. एवढेच नव्हे तर पक्षातील स्थानिक ज्येष्ठ आणि सिनीअर नेत्यांच्या बैठकीस अगर कार्यक्रमांना अगर आंदोलनांना डावलण्यात या दोहोंनी कसर सोडलेली नाही असा आरोप हि होतो आहे. पाच वर्षे खऱ्या अर्थाने सत्तेत सहभागी झालेल्या या दोहोंच्या कामगिरीवर तोंडावर आलेल्या महापालिका निवडणुकीचे यश सामावलेले आहे. परंतु चुकलेल्या नियोजनाची चिंता न करता आपल्याच विश्वात रमणाऱ्या या दोहोंनी जणू काही भाजपा मध्येच सवता सुभा निर्माण केला आहे आणि प्रसंगी ते स्थानिक नेत्यांना ओव्हरटेक करू शकतात अशी स्थिती असल्याचे एकूणच वृत्त सूत्रांनी दिले आहे. शंभर माजी नगरसेवकांना आपापल्या वार्डात समस्यांना तोंड देताना प्रशासनाच्या राजकारणाशी सामना करावा लागतो अशा वेळी त्यांना या दोहोंनी बळ देण्याची गरज भासते परंतु त्यात हे रस दाखवीत नसल्याने त्यांच्याबद्दल नाराजी असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.