नव्या मुख्य निवडणूक आयुक्तांकडे करणार २ मागण्यांसाठी पाठपुरावा
पुणे- निवडणुकीत खोटी आश्वासने दिली,किंवा पूर्ण केली नाहीत तर नागरिकांना फसवणुकीचा गुन्हा दाखल करता यावा या अनुषंगाने राजकीय पक्ष आणि उमेदवारांचे जाहीरनामे,वचननामे यासाठी विशेष कायद्यांतर्गत तरतुदीचा अंतर्भाव करावा अशा मागणी सह २ मागण्यांसाठी प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते डॉ.विश्वंभर चौधरी यांनी पाठपुरावा करण्याचा निर्धार केला आहे.त्यांच्या या निर्धारामुळे,खरेच असे झाले तर मग कोर्टातच लोक विचारतील ‘पेट्रोल के दाम कम हुये कि नही….?अशा प्रकारच्या चर्चेला आता तोंड फुटणार आहे. आणि एकूणच कर किती असावा यावरही मंथन होऊ शकणार आहे.
विश्वंभर चौधरी यांनी प्रत्यक्षात असे म्हटले आहे कि, राजीव कुमार नावाचे अधिकारी भारताचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून १५ मे पासून पदभार घेत आहेत. त्यांच्याकडे लवकरच या दोन मागण्यांचा पाठपुरावा करणार आहे.त्या पुढील प्रमाणे.
१. IAS आणि IPS च्या धर्तीवर IES अर्थात Indian Election Services ही श्रेणी सुरू करावी. IES अधिकारी फक्त आणि फक्त केंद्रीय आणि राज्य निवडणूक आयोगांमध्येच बदलीवर जातील, कोणत्याही सरकारचे नोकर असणार नाहीत.
२.राजकीय पक्षांचे जाहीरनामे, वचननामे इत्यादी ग्राहक हक्क संरक्षण कायद्याखाली आणावेत. खोटी आश्वासनं दिलेल्या राजकीय पक्षावर,किंवा उमेदवारांवर लोक फसवणुकीचा गुन्हा दाखल करू शकले पाहिजेत.