पुणे -दरमहा बिल न पाठविल्याने आता एकदम ३ महिन्याचे बिल पाठवून वाढीव युनिट नुसार ग्राहकांच्या खिशावर दरोडा टाकण्या ऐवजी सरसकट सर्वांचे ३ महिन्याचे बिल विज्वितार्ण कंपनीने माफ करावे आणि पुढील जुलाई महिन्याप्सुंचे युनिट पकडून पुढे ऑगस्ट पासून बिल आकारणी करावी अशी मागणी संभाजी ब्रिगेड चे संतोष शिंदे यांनी राज्य सरकार आणि वीज वितरण कंपनीकडे केली आहे.
ते म्हणाले,’महावितरण कंपनी तीन महिन्यात लाईट बिल पाठवले नाही. त्यामुळे बऱ्याच लोकांनी वीज बिल भरलेले नाही. उन्हाळा व लॉकडाऊन असल्याने तीन महिन्यात वापरलेली वीज अंदाजे तीनशे युनिटच्या वर गेलेली आहे. याचा अर्थ विज बिल मिळालं नसल्यामुळे विनाकारण तीनशे युनिटच्यावर विज बिल रक्कम अर्थात जास्तीचा भरणा सामान्य माणसाला करावा लागणार आहे. 100 युनिट च्या आत 3.05 रू. एवढा वीज आकार आहे. 101 ते 300 युनीट – 6.95 रूपये, 300 ते 500 युनीट 9.90 रू व 1000 च्या पुढे 12.50 रूपये इतका वीज आकार (रेट) आहे. मात्र तीन महिन्याचे एकत्रित वीजबिल आल्यामुळे सरसकट सगळ्या नागरिकांना जास्तीच्या विज आकार (किंमत) बिल भरावे लागेल. महावितरण कंपनीने प्रत्येक महिन्याला बिल न पाठवल्यामुळे बऱ्याच नागरिकांनी वीज बिल भरलेले नाही. त्यांना आता तीन महिन्याचा जास्तीचा भुर्दंड सामान्य नागरिकांच्या खिशावर वीज वितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे उदंड बसणार आहे. बिल पाठवणे ही कंपनीची चूक आहे. असे असताना त्याची झळ सामान्य माणसांनी का भरायचे हा आर्थिक भुर्दंड सामान्य लोकांनी का भरायचा हा प्रश्न आहे. मुख्यमंत्री व ऊर्जामंत्री यांनी यामध्ये तात्काळ तडजोड करून सरसगट तीन महिन्याचे वेगवेगळे पैशांनी विज भरणा करून घ्यावा हा सामान्य नागरिकांच्या खिशावर पडलेला दरोडा आहे. हे विज बिल रद्द करा किंवा तिन महिन्याचे विजबील माफ करा… अन्यथा संभाजी ब्रिगेड तीव्र आंदोलन करणार आहे.असा इशारा संभाजी ब्रिगेड चे संतोष शिंदे यांनी दिला आहे.
विधानसभेच्या काळात काँग्रेसने 100 युनिटपर्यंत विज बिल माफ करू असे जाहीरनाम्यात सह भाषणामध्ये जाहीर केलेले आहे. मात्र सत्तेवर येऊन सुध्दा आजपर्यंत अंमलबजावणी झालेली नाही. दिल्लीमध्ये 100 युनिटपर्यंत वीज मोफत आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्रात सुद्धा 100 युनिटपर्यंत वीज सर्वांना सरसकट मोफत मिळाली पाहिजे. मात्र सध्या कोरोनाचे संकट भयानक व महामारी स्वरूपात असल्यामुळे सर्व जण अत्यंत अस्वस्थ आहेत. त्यामुळे कोरोना महामारी च्या धर्तीवर मार्च महिन्यापासून ३ महिन्याचे सर्वांचे लाईट बिल अर्थात ‘वीज बिल माफ’ करावे अशी संभाजी ब्रिगेडच्या वतीने विनंतीवजा मागणी आहे.