पुणे- ब्रिटिशांनी सगळं मुंबईत केलं, पण शिवसेनेनं मुंबईत काय केलं? असा खोचक सवाल आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी सेव्हन लव्हज चौक ते वखार महामंडळ दरम्यानच्या भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर उड्डाण पुलाच्या लोकार्पण समारंभात बोलताना केला . भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक माजी सभागृहनेते श्रीनाथ भिमाले ,कविता वैरागे, राजश्री शिळीमकर आणि प्रविण चोरबोले यांच्या सातत्याच्या प्रयत्नातून हा उड्डाणपूल झाल्याचे नमूद करत यावेळी उपस्थित नेत्यांनी त्यांचे कौतुक केले .यावेळी खासदार गिरीष बापट, आमदार सुनिल कांबळे, महापौर मुरलीधर मोहोळ ,उपमहापौर सुनीता वाडेकर, सभागृहनेते गणेश बिडकर, दिलीप वेडेपाटील उपस्थित होते.
आज या पुलाचे उद्घाटन ठरलेले असताना काल राजकीय हेतूने अचानक येऊन राष्ट्रवादी आणि शिवसेनेने या पुलाचे उद्घाटन करण्याचे आंदोलन केले या पार्श्वभूमीवर उपस्थित नेत्यांनी यास प्रतिउत्तर दिले .तो धागा पकडून पाटील म्हणाले,'”मुंबईत म्हातारीचा बुट ब्रिटिशांनी केला, राणीची बाग ब्रिटिशांनी केली . ब्रिटिशांनीच सगळं केलं. मग शिवसेनेनं मुंबईत काय केलं? याआधी काँग्रेसची सत्ता होती. त्यांनीही काही केलं नाही.
भाजपा नगरसेवकाकडून पुणे शहरासाठी खूप चांगली कामे झाली आहेत. काँग्रेससारखी रस्ते, ड्रेनेजच्या कामात आमच्या नगरसेवकांनी वेळ घालवलेला नाही. उड्डाणपूलमुळे व्यापारी व स्थानिकाना या पुलाचा नक्की चांगला उपयोग होईल. भिमालेनी मागील पंधरा वर्षात दक्षिण उपनगरात चांगले प्रकल्प पूर्ण केलेले आहेत असे प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी सांगितले. खासदार गिरीश बापट यांनीही या पुलाच्या भूमिपूजनाचे काम माझ्या हस्ते झाले होते , कोरोना महामारीमुळे या पुलास थोडा उशीर झाला पण एकदा आम्ही कमीटमेंट केली कि ती पूर्ण करतो,याचा आम्हाला आनंद असल्याचे सांगितले . पुणे महानगरपालिकेत आमच्या नगरसेवकाची कामे उल्लेखनीय आहेत. या उड्डाणपूलाचे काम श्रीनाथ भिमाले हे सभागृहनेता असताना या उड्डाणपूलासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून घेतल्या मुळे व भिमाले यांनी योग्य रित्या पाठपुरावा करून उड्डाणपूल पूर्ण केलेय हा एक आदर्श त्यांनीा दाखवून दिला आहे. याचा आम्हाला अभिमान आहे. श्रीनाथ भिमाले यांच्या प्रयत्नातून साकार झाल्याल्या नविन उड्डाणपूलाच्या कार्यक्रमास व त्यांच्या विकासकामासाठी शुभेच्छा.व आमच्या दादांना सुद्धा वाढदिवसाच्या शुभेच्छा असे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे सांगितले. पुणे शहराचा चौफेर विकास हे सत्ताधारी आमच्या पक्षाचे उद्दिष्टे आहेत. शहरात मेट्रो, उड्डाणपूल सारखे प्रकल्प पूर्णत्वास आहेत. भविष्यात पुणेकरांना अनेक नागरी सुविधा देण्यात आम्ही यशस्वी होऊ, हे या उड्डाणपूल विकासकामावरून समजून आले आहे असे महापौर मोहोळ यांनी सांगितले. सूत्र संचालन निलेश बडे व आभार चेतन चावीर यांनी मानले