पुणे-कात्रज ची पेशवेकालीन धरणे ते मुठा नदीपर्यंत निसर्गावर केलेल्या कॉंक्रीटच्या प्रहाराचे, काही जीव गामावून ,लाखोंचे मोल दिल्यानंतरही पुणेकरांना याबाबतची गंभीरता लक्षात आली कि नाही ?असे वाटावे अशी परिस्थिती आहे अगदी कात्रजच्या धरणालगत जंगल नष्ट करून उभे करण्यात आलेले लेक टाऊन पासून ते संपूर्ण आंबील ओढ्यावरील अतिक्रमणांना एवढे जीव जाऊन , एवढे सरकारी मोल देऊन हि कोणताही धोका पोहोचल्याचे दिसून आलेले नाही .काटकोनात वळविलेला नाला तेव्हा न पाहता बिल्डरला लाखो रुपये मोजून करोडोच्या सदनिका घेतलेले जेव्हा आपल्या मोटारी बुडाल्या तेव्हा जागे झाले आणि आता पुन्हा झोपले कि काय ? असा प्रश्न उपस्थित व्हाह अशीच स्थिती कायम आहे .गेल्यावर्षी झालेला महापूर आणि झालेली हानि याची आठवण येता असे प्रश्न निर्माण होत आहे.
या भागातील नगरसेविका अश्विनी कदमांच्या पुढाकाराने महापालिकेतील नगर अभियंता प्रशांत वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या कार्यालयात आंबील ओढ्याला दिनांक 25सप्टेंबर 2019 रोजी आलेल्या पुराच्या अनुषंगाने दिनांक16मार्च २०२० रोजी बैठक झाली . मलनिस्सारण विभागाचे अधीक्षक अभियंता प्रविण गेडाम उद्यान अधीक्षक घोरपडे बांधकामविभागाच्या हर्षदा शिंदे , सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयाचे लखानी , व प्राईममूव्ह संस्थेचे विशाल उजागरे इत्यादी अधिकारी या बैठकीस उपस्थित होते. यावेळी अनेक मुद्द्यांवर चर्चा होऊन कार्यवाही करण्याचे ठरविण्यात आले होते.परंतु आजपर्यंत तरी या संदर्भामध्ये ठरविण्यात आलेली कोणतीही कामे पूर्ण झालेली नाहीत.पावसाळा पंधरा-वीस दिवसांवर आलाय, पण पूर आला तेव्हा जेवढी अतिक्रमणे होती तेवढीच अतिक्रमणे आंबील ओढ्यावर अजूनही आहेत . त्याची रुंदी-खोली वाढवलेली नाही ,पुलांची उंची वाढवलेली नाही , अनावशक लोखंडी पूल काढून टाकलेले नाहीत . नाल्यातील सीमा भिंतीची कामे असो,ड्रेनेज लाईन,चेंबर असो किंवा इतर कामे ही जागेवर झालेलीच नाहीत.
जी कामे प्रशासनाने करायची ठरवली ती देखील झाली नाहीत हे सर्वात मोठे दुर्दैव आहे. अन्यथा लोक तर फ्लॅॅट घेताना पहात नाहीत आजू बाजू च्या निसर्गावर प्रहार करून ,निसर्गावर अगणित वार करून उभी राहिलेल्या बिल्डींग मध्ये फ्लॅॅट घेतून त्यांना मोठा मोठेपणा प्राप्त झाल्याचा आनंद होतो . करोडो रुपयांच्या नोटांचा पूर बिल्डर घेऊन जातो आणि नंतर आता होऊ नये तसं घडू लागलंय, निसर्गाकडून
आता या मानवी वृत्तीच्या दानाची परतफेड होऊ लागलीय . अधिकाऱ्यांना,प्रशासनाला दोष देणे सोडा ,पण दुर्दैवाने माणसेदेखील अजूनही जागी झाली नाहीत.निसर्गाचा कोणता कोप त्यांना अपेक्षित आहे तेच जाणोत .