पुणे- तळजाई चे जंगल हे नैसर्गिकरीत्या जंगलाच राहू द्यात ,ते मानवनिर्मित उद्यान बनवू नका हि पर्यावरणप्रेमी यांची मागणी असून तिच्याशी आपण सहमत असल्याने तीच मागणी आज आपण राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यापुढे मांडल्याचे या भागातील भाजपचे नगरसेवक महेश वाबळे यांनी सांगितले . आज पुण्याच्या विधान भवनात उपमुख्यमंत्री यांनी तळजाई येथील नियोजित जैववैविध्यपार्क च्या संदर्भात मते आजमाविण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांची बैठक घेतली या बैठकीस भाजपच्या आमदार माधुरी मिसाळ आणि नगरसेवक महेश वाबळे ,स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने तसेच अन्य पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
१०८ एकर जागेवर जैववैविध्य पार्क उभारण्याच्या प्रकल्पाचे कॉंग्रेसचे माजी उपमहापौर आणि ज्येष्ठ नेते ,सध्याचे महापालिकेतील कॉंग्रेसचे गटनेते आबा बागुल यांनी जोरदार प्रयत्न सुरु केले आहेत . त्यादृष्टीने सदू शिंदे स्टेडीअम चे उद्घाटन हि पूर्वीच संपन्न झाले . आणि नंतर सोलर प्रकल्प आणि बांबू उद्यानाचे काम सुरु होताच त्यास विरोध सुरु झाला . आणि हा संपूर्ण प्रकल्प वादाच्या भोवऱ्यात सापडला . या प्रकल्पास अधिकृत मान्यता नसल्याची भूमिका आज भाजपच्या वतीने मांडण्यात आली .या प्रकल्पाच्या अनुषंगाने वृक्षतोड आणि काँक्रीटीकरण वाढणार असल्याचा आरोप करण्यात आला . यामुळे उपमुख्यमंत्री यांनी सर्वांनी एकत्रित येऊन सहमतीने पुण्याला चांगला प्रकल्प देता येईल अशा पद्धतीने अगोदर स्थायी समिती हवे तर मुख्य सभा यांची मान्यता घेऊन नंतर आपणाकडे प्रकल्प घेऊन या असे सांगितल्याचे वाबळे यांनी सांगितले.SHOW LESS