पुणे- कोरोनाचे काम करताना मृत्युमुखी पडलेल्या पालिका सेवकांना १ कोटीचे सुरक्षा कवचाचा आज पुनरुच्चार करत महापौरांनी मुख्य सभेची मान्यता मिळेल या भरवश्यावर आता पर्यंत मृत्युमुखी पडलेल्याच्या वारसांना किमान २५ लाख तरी द्या अशी विनंती आयुक्तांना केल्याने विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ यांनी , नुसत्या सूचना आणि घोषणा कशाला महापौर साहेब थेट कार्यवाही सुरु करा हो .. असे आवाहन केले आहे.
त्या म्हणाल्या ,’कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजना अंतर्गत कार्यरत मनपा अधिकारी कर्मचारी यांचा मृत्यू झाल्यास केंद्र सरकार 50 लाख मृत सेवकांच्या कुटूंबास देणार ही घोषणा हवेत गेल्याने आज महापौरांनी मुख्य सभा मान्यता देईल या भरवश्यावर कोरोनामुळे मृत्यू झालेल्या सेवकांच्या कुटुंबास 25 लाख रुपये देण्यासाठी आयुक्तांना निवेदन दिले त्यावर आम्ही सहमती दिली.
पुणे शहरामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत असताना म्रुत्युचे प्रमाण वाढत होते. यामध्ये पुणे महानगरपालिकेचे कर्मचारी , अधिकारी व इतर सेवकांना कोरोना आटोक्यात आणण्यासाठी रात्रदिवस आपल्या जिवाची पर्वा न करता काम करीत आहेत. यातच काही सेवक व अधिकारी यांना आपले प्राण गमवावे लागले. त्यावेळी महापौर यांनी अशा निधन झालेल्या सेवकांना एक कोटी रूपयाचे सुरक्षा कवच जाहिर केले. यामध्ये केंद्र सरकारची पन्नास लाख रुपयांची विमा योजना व पन्नास लाख रुपये पुणे महानगरपालिका देणार असे एक कोटी रुपयांचा सुरक्षा कवच जाहिर केले. त्याचबरोबर जर मयत झालेल्या सेवकाच्या वारसाला मनपा त नोकरी हवी असेल तर पंचवीस लाख रूपये रोख मनपा देणार असे जाहीर केले होते. परंतु आज पर्यंत एकाही मयत सेवकाला या सुरक्षा कवचाचा लाभ मिळाला नाही. आज असे समजते की केंद्राच्या विमा कंपनीने ही प्रकरणे रिजेक्ट केले आहे. या योजनेचा सुध्दा महापौर व प्रशासनाने पाठपुरावा करावा व मयत सेवकांना या योजनेचा लाभ मिळवुन द्यावा.परंतु आम्ही कोरोना मुळे मृत्यू झालेल्या सेवकांना आर्थिक मदत व वारसांना तातडीने नोकरी ही मागणी सुरुवातीपासून करीत आहोत.कोरोनामुळे मृत्यू झालेल्या सेवकांच्या वारसांना तातडीने नोकरी द्यावी अशी आमची आग्रही मागणी आहेच, पण आजचे निवेदनानंतर प्रत्यक्षात मनपा सेवकांच्या कुटुंबाला आर्थिक मदत मिळाली पाहिजेराष्ट्रवादी काँग्रेस याविषयी पूर्णपणे प्रशासनाच्या पाठीशी आहे. परंतु आमची प्रशासनाला विनंती आहे की हे पचंवीस लाख रुपयांची आर्थिक मदत त्वरित मयत सेवकांच्या वारसांना मिळावी यासाठी तातडीने कार्यवाही करावी.असे दिपाली धुमाळ यांनी म्हटले आहे.