पुणे-पहाटे दोन वाजता पर्वती जलकेंद्र येथे मोठा बिघाड झाल्यामुळे कोणतीही पूर्वकल्पना न देता संपूर्ण पर्वती परिसरात पाणीपुरवठा विस्कळीत झाल्यामुळे आज शिवदर्शन, लक्ष्मीनगर ,तावरे कॉलनी, अरण्येश्वर, पद्मावती, सहकारनगर, चव्हाण नगर, संभाजी नगर ,तळजाई, बिबवेवाडी, मार्केट यार्ड,महर्षी नगर परिसरामध्ये नागरिकांचे प्रचंड हाल झाले आहेत.करोनाच्या पार्श्वभूमीवर स्वच्छतेसाठी पाण्याची अत्यंत गरज असताना नागरिकांना अचानक कोणतीही पूर्वकल्पना न देता पाणीपुरवठा बंद झाल्यामुळे पिण्याच्या पाणी सुद्धा उपलब्ध होऊ शकले नाही त्यामुळे नागरिक अक्षरशा हतबल झाले व नागरिकांनी संताप सुद्धा व्यक्त केला.पुणे महानगरपालिकेचा हा अत्यंत भोंगळ कारभार त्याचा फटका आज वरील भागातील नागरिकांना बसला.पाण्यासाठी जनजीवन विस्कळीत झाले होते.
विद्युत पुरवठा करणारे बावीस केव्ही ची केबल फ्लॅश झाली असे कारण सांगण्यात येत आहे. परंतु अशा पद्धतीने विद्युत पुरवठा खंडित झाल्यानंतर अन्य मार्गाने किंवा दुसरा पर्याय महानगरपालिकेकडे विद्युत पुरवठा करण्यासाठी उपलब्ध नव्हता ही अत्यंत खेदाची बाब आहे. पुणे महानगरपालिकेने समान पाणीपुरवठाच्या नावाखाली दोन हजार कोटी कर्जे काढलेल्या असताना नागरिकांवर अशी वेळ येते हे अत्यंत दुर्दैवी आहे. म्हणूनच पुणे महानगरपालिका नागरिकांचा सहनशक्तीचा अंत पाहते का? असा सवाल राष्ट्रवादीच्या नगरसेविका अश्विनी कदम यांनी उपस्थित केला.