चिटणीस नावाच्या अधिकाऱ्यावर भाजपा कार्यकर्ते संतापले –लोक म्हणाले ,गडकरी देखील खोटे बोलले ?
पुणे- पु णे-सातारा महामार्गावरील खेडशिवापूर टोल टर्मिनेट करण्यात आला आहे, अशी माहिती केंदीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी पुण्यात दिली होती.पण चिटणीस नावाच्या कुणा अधिकाऱ्याने गडकरींच्या भाषणातील या जाहीर घोषणेला पायदळी तुडवीत त्यांच्या वक्तव्याला झुगारून लावल्याने वाहनचालकांप्रमाणे आता भाजपा कार्यकर्त्यांमध्ये देखील संतापाची लाट पसरली आहे .स्वतः गडकरींनी भाषणात सांगितले होते पुणे ते सातारा रस्त्यावरील टोल आता टर्मिनेट केला आहे. तरी अधिकाऱ्याचे वक्तव्य असे प्रसिद्ध होतेच कसे? हा चिटणीस मोठा कि गडकरी मोठे असा सवाल भाजपा कार्यकर्ते विचरू लागले आहेत
पु णे-सातारा महामार्गावरील खेडशिवापूर टोल टर्मिनेट करण्यात आला आहे, अशी माहिती केंदीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी पुण्यात दिली होती पण, हा टोल बंद होणार नसून रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यंत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) रिलायन्स इन्फ्राकडून स्वतःच्या ताब्यात घेणार आहे.एवढेच सांगून चिटणीस यांनी टोलधाड सुरूच राहण्याचे स्पष्ट करण्यासाठी टोल बंद होणार नाही असे काही माध्यमांना सांगितले. आणि त्यांनी ते प्रसिद्ध केले . यामुळे गडकरी मोठे कि हे चिटणीस मोठे असा सवाल आता निर्माण झाला आहे. जर यावर स्पष्टीकरण केले नाही तर येत्या निवडणुकात आम्हाला त्याची झळ पोहोचेल असा स्पष्ट इशारा आता कार्यकर्ते देऊ लागले आहेत .
टोल टर्मिनेट होणार याचा अर्थ पुणे-सातारा रस्त्यावरील टोल बंद होणार नाही. तर खेड-शिवापूर टोलनाका काही काळासाठी रिलायन्स इन्फ्राकडून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे हस्तांतरीत करण्यात येणार आहे. खेडशिवापूर टोल नाका राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण स्वतःच्या ताब्यात घेणार आहे. या कालावधीत कंत्राटदाराला म्हणजेच रिलायन्स इन्फ्राला टोलचे पैसे मिळणार नाहीत. पुणे-सातारा रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यंत टोलनाका NHAIच्या ताब्यात असेल.रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर पुन्हा टोलनाका रिलायन्स इन्फ्राकडे देण्यात येईल. तसेच रस्त्याच्या कामासाठी खर्च झालेली रक्कम रिलायन्स इन्फ्राकडून वसूल करण्यात येईल.असे चिटणीस नावाच्या अधिकाऱ्याने सांगितल्याचे वृत्त आज काही ठराविक माध्यमांनी प्रसिद्ध करताच या वरून संतापाचे वातावरण निर्माण होते आहे.