कोरोना रोखण्यासाठी आता तरी पक्षनेत्यांची बैठक घ्या -विरोधीपक्षनेत्यांचे आयुक्तांना आवाहन
पुणे- महापालिकेने कोरोना रोखण्यासाठी वेळेवर ज्या ज्या उपाययोजना करायला हव्या होत्या त्या त्या केल्या नाहीत त्यांची दिरंगाई महागात पडली आणि पुण्यात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली .पुणे विभागात ६५ टक्के कोरोनाग्रस्तांची संख्या हि पुण्याची आहे. किमान आता तरी सत्ताधारी भाजपाने एककल्लीपणा सोडून सर्व पक्षनेत्यांची बैठक बोलावून सर्वसंमत उपाययोजना गतीने अंमलात आणाव्यात अशी मागणी महापालिकेतील विरोधीपक्ष नेत्या सौ.दिपाली प्रिदिप धुमाळ यांनी आयुक्तांकडे केली आहे. फेबुवारीतच कोविड केअर सेंटर आणि जम्बो सेंटर सारख्या सर्व यंत्रणा पूर्ण क्षमतेने सुरु ठेवल्या असत्या तर आज पुण्यावर ओढवलेली स्थिती ओढवली नसती .मात्र या साऱ्या यंत्रणा मार्च अखेरीस अपुऱ्या क्षमतेने सुरु करण्यात आल्या .आणि या एका महिन्यातच कोरोनाग्रस्तांची संख्या पाच पटीने वाढली ,आणि ती वाढल्यानंतर सत्ताधारी व प्रशासन उपाययोजना सुरु करू लागले,असा आरोपही त्यांनी केला आहे .
दरम्यान याबाबत त्यांनी महापालिका आयुक्तांना दिलेल्या पत्रात म्हटले आहेकी ,’ पुणे शहरात दिवसेंदिवस कोरोना चे रुग्ण झपाट्याने वाढत आहे.गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरात रोज 6 हजाराच्या वर रुग्णांची संख्या आहे. वाढत असलेल्या रुग्णांच्या संख्या च्या मानाने महानगरपालिकेतर्फे आवश्यक ती योजना झाल्याचे दिसत नाही.प्रशासन व सत्ताधारी या संबधी अनेक उपाययोजना व निर्णय व धोरण ठरवत आहे. परंतु याला फारसा यश मिळत नाही. उलट अधिकच परिस्थिती गंभीर होत चाललेली दिसत आहे. अनेक ठिकाणी समस्या आहे मग त्या कोर॔नटाईन केलेल्या रूग्णाच्या बाबतीत असतील किंवा बेड्स बाबत असतील. अनेक रुग्ण बेड्स न मिळाल्यामुळे घरीच राहात आहेत. त्यामुळे घरातील लोकांची व परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या आधी सुद्धा आम्ही व्हेटिलेटर ,ऑक्सिजन बेड वाढवणे व काही उपाय योजना आखणे संबंधित पत्र आपणास दिले होते.तसेच यापूर्वी आम्ही प्रत्येक क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत किमान एक सी.सी.सी सेंटर सुरू करावा अशी मागणी केली असता त्याची पूर्तता झालेली नाही व तसेच खाजगी रुग्णालयांमध्ये सुद्धा बेड्स उपलब्ध होत नाही,त्यामुळे नाहक रुग्णांचा बळी जातो. मुंबई महानगरपालिके प्रमाणे उपायोजना आखल्या गेले आहेत,त्याच धरतीवर आपल्या पुणे महानगरपालिकेने सुद्धा आखाव्यात.या सर्व बाबी अत्यंत चिंताजनक व गंभीर स्वरूपाचे आहेत. यावर उपाय योजना आखण्यासाठी पुणे महानगरपालिकेतील सर्व पक्षीय नेत्यांबरोबर तातडीने बैठक आयोजित करावी .