पुणे-महामारी आणि लॉक डाउन च्या काळात कशाला झंझट ? अंगावरुन झुरळ झटकावे तसे नियमांची ढाल करत लोकांच्या अडचणी झटकुन टाकायच्या वृत्तीने कंटेन्त एरियातील एका अत्यवस्थ रुग्णाला मदत मिळू शकली नाही, आणि अखेर जीव गमविन्याची वेळ एका वर आल्याचे स्पष्ट झाले आहे.आता चौकशीत देखील अजूनही पुन्हा या प्रकरणी हीच मानवी प्रवृत्ती दिसून येत असून कोणी आपली चूक वा जबाबदारी मान्य करायला पुढे येत नसून, एकमेकांकड़े बोटे दाखविन्याचा खेळ खेळत असल्याचे दिसत आहे. दरम्यान हा सर्व प्रकार सोशल मीडिया त फिरलेल्या एका व्हिडिओ ने उघड़ झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
यांच्या मृत्युला जबाबदार कोण? पोलिस की रुग्णवाहिका
शहराच्या मध्य वस्तीतील नाना पेठेतील ५४ वर्षीय व्यक्तीला उपचार करण्यास नेण्यासाठी वेळेत अॅम्ब्युलन्स न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याच्या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. या घटनेत अॅम्ब्युलन्स न मिळण्याची वेगवेगळी कारणे देण्यात येत असून, महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी या प्रकरणी अॅम्ब्युलन्स सेवा पुरविणाऱ्या संस्थेकडून खुलासा मागविला आहे. या घटनेमुळे शहरात जागोजागी करण्यात आलेले ‘बॅरिकेडिंग’ही डोकेदुखी ठरत असून, मुख्य रस्तेही बंद करून गल्लीबोळांतील रस्ते चालू ठेवण्यात आले आहेत.
नाना पेठेतील ५४ वर्षीय यशूदार मोती फ्रान्सिस यांचा उपचारांअभावी मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी पहाटे घडली. फ्रान्सिस यांच्यापर्यंत अॅम्ब्युलन्स का पोहोचू शकली नाही, याचा खुलासा महापालिका आयुक्त गायकवाड यांनी मागवला आहे. फ्रान्सिस यांच्या कुटुंबीयांनी सरकारी हेल्पलाइन क्रमांक १०८; तसेच पोलिस नियंत्रण कक्ष १०० क्रमांकावर संपर्क साधून मदत मागितली होती. ही मदत त्यांना वेळीच न मिळाल्याने फ्रान्सिस यांचा मृत्यू झाल्याची टीका सर्वत्र होत आहे
बाबांना हदयाचा त्रास असल्यानं आम्ही सगळीजण नेमही त्यांची काळजी घ्यायचो; अगदी रात्री-अपरात्री त्रास जाणवला तरी. आधी हॉस्पिटलमध्ये जायचो, ते बरे व्हायचे. पण गुरुवारी दोन-अडीच तास फोनाफोनी करूनही आम्हाला रुग्णवाहिका न मिळाल्याने वेळेत हॉस्पिटल गाठता आले नाही आणि बाबांना वाचवू शकलो नाही…रुग्णवाहिका आली असती, तर ते बरे होऊन घरी परतले असते…यंत्रणांच्या बेजबाबदारपणाने गुरुवारी रात्री रस्त्यावर अखेरचा श्वास घेतलेल्या येशूदास फ्रान्सिस यांचा मुलगा मॅक्सने आपल्या वडिलांच्या वाट्याला आलेली वेळ आपल्या भावनेतून उभी केली.नाना पेठेत फुले-हार विक्रीचा व्यवसाय ते करत अचानक गुरुवारी रात्री त्रास वाढल्याने ते हॉस्पिटलमध्ये निघाले; पण रुग्णवाहिका न आल्याने त्यांनी रस्त्यावर अखेरच श्वास घेतला. अशा प्रकारे एखाद्या व्यक्तीला जीव गमावावा लागल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
कोरोनाला रोखण्यासाठी बाधित क्षेत्रांच्या परिसरात म्हणजे मध्यवर्ती भागांतील पेठांभोवती पत्र्यांचे जाळे उभारले गेले आहे. प्रमुख रस्ते आणि चौकही बंद आहेत.
कोरोनाची साथ असूनही काही भागांत साधी रुग्णवाहिका जाईल, इतका रस्ता मोकळा ठेवण्यात आलेला नाही. त्यामुळे रुग्णांची ने-आण करणाऱ्या रुग्णावाहिकाचालकांसह नातेवाइकांची प्रचंड गैरसोय होत आहे. त्याचाच भाग म्हणून गल्लीबोळ बंद असल्याची कारणे देत रुग्णवाहिका न मिळाल्याने गुरुवारी रात्री एका व्यक्तीला रस्त्यावर आपला जीव गमवावा लागला. यासाठी आरोग्य खात्यासह पोलिस यंत्रणेलाही जबाबदार धरले जात आहे. मात्र, या घटनेशी आपला संबंध नसल्याचा खुलासा संबंधित यंत्रणा करीत असल्या तरी, अशा काळात किमान रुग्णांची सोय व्हायला हवी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे
पोलीस आणि आपत्कालीन वैद्यकीय सेवा यांच्यातील समन्वयाअभावी अत्यवस्थ रुग्णाला `गोल्डन अवर`मध्ये उपचार न मिळाल्याने मृत्यू झाल्याचे शुक्रवारी स्पष्ट झाले.
नाना पेठेत, मध्यरात्री रुग्णवाहिका न मिळाल्याने रुग्णाचा मृत्यू झाला. या प्रकरणाची वस्तूस्थिती जाणून घेण्या चा प्रयत्न केला असता,. बीव्हीजी 108चे आपत्कालीन वैद्यकीय सेवेचे (इएमएस) चिफ ऑपरेटींग ऑफिसर (सीओओ) डॉ. ज्ञानेश्वर शेळके आणि समर्थ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम या दोघांच्या बाजू जाणून घेतल्या. त्यातून हे स्पष्ट झाले.
पोलिस संपर्क ,कंट्रोल रूमचा फोन कधी लागतो ? – नेहमीचीच समस्या…108
108ची रुग्णवाहिका घटनास्थळावर पोचली होती. पण, ज्या पोलिसांनी 108च्या कंट्रोल रूमशी संपर्क साधला होता. त्यांचा फोन लागला नाही. त्यामुळे नाना पेठेत रुग्णाचा नेमका पत्ता सापडला नाही, अशी माहिती 108 रुग्णवाहिकेतर्फे देण्यात आली.
डॉ. शेळके म्हणाले, “पोलिसांनी कॉल केल्यानंतर 108ची रुग्णवाहिका 15 ते 20 मिनीटांमध्ये घटनास्थळावर पोचली. वीस मिनिटे रुग्णवाहिका घटनास्थळावर थांबली होती. पोलिसांनी ज्या फोन नंबरवरून 108 ला रुग्णाची माहिती देणारा फोन केला होता, त्याच्यावर रुग्णवाहिकेच्या चालकाने संपर्क साधण्याचा वारंवार प्रयत्न केला. पण, पोलिसांशी संपर्क झाला नाही. घटनास्थळावर रुग्ण नेमका कुठे आहे, हे सापडत नसल्याची माहिती रुग्णवाहिकेच्या चालकाने परत कंट्रोल रुमला दिली आणि 20 मिनीटांनंतर नाना पेठ भागातील घटनास्थळ सोडले. या भागात सगळीकडे बॅरिगेटस् टाकून रस्ते बंद केले होते. त्यामुळे रुग्णवाहिका पुढे जाऊ शकली नाही. या प्रकरणात पोलिसांशी चर्चा झाली आहे. त्यात पोलिसांनी सांगितले की, या दरम्यान पोलिसांची कामाची वेळ संपल्याने ते तेथून गेले.”कॉल केलेल्या पोलिसांशी संपर्क झाला नाही, या एकाच कारणाने रुग्णाला वैद्यकीय मदत मिळू शकली नाही, असेही त्यांनी सांगितले.
108 ने प्रतिसाद दिला नाही -पोलिसांचा पलटवार
रुग्णाचे प्राण वाचविण्यासाठी पोलिसांनी शेवटच्या क्षणापर्यंत कसोशीने प्रयत्न केला. पण, त्याला 108 आपत्कालीन रुग्णवाहिकेने प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे रुग्णाचा मृत्यू झाला.
108च्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केलेल्या मतावर प्रतिक्रिया देताना कदम म्हणाले, “पोलिसांची ड्युटी कधीही रात्री साडेबारा वाजता बदलली जात नाही. 108 ला फोन केलेल्या पोलीसांचा संपर्क होत नसेल तर, रुग्णवाहिकेच्या चालकाने नियंत्रण कक्षाकडे संपर्क का नाही केला.”
कदम म्हणाले, “पोलीस कंट्रोल रूमकडून घटनास्थळी रवाना होण्याचा कॉल मिळाला. मार्शल आणि नाईट राऊड पोलीस ऑफिसर घटनास्थळी तातडीने दाखल झाले. त्याच वेळी पोलीसांनीही रात्री एक वाजता 108 क्रमांकावर फोन लावला. रात्री साडेतीन वाजेपर्यंत पोलीस रुग्णवाहिकेला फोन करत होते.
पोलिस म्हणतात अन्य 2 रुग्णवहिकानी पोलिसांचे ऐकले नाही
पण, कोणतीही रुग्णवाहिका मिळाली नाही. रस्त्यावरून जाणाऱ्या दोन रुग्णवाहिका पोलिसांनी थांबविल्या. रग्णाला रुग्णालयात घेऊन चला, अशी विनंती केली. डॉक्टर नाही, म्हणून पहिल्या रुग्णवाहिकेने रुग्णाला घेतले नाही. तर, कॉल असल्याचे सांगत दुसऱ्या रुग्णवाहिकेने रुग्णाला घेण्यात असमर्थता दर्शविली, असेही त्यांनी स्पष्ट केले.
अखेर रस्त्याने जाणारा छोटा टेंपो अडवला आणि रुग्णाला रुग्णालयात हलविले. साडेचार वाजेपर्यंत पोलीस तेथे होते, असेही त्यांनी सांगितले.