पुणे- राज्यात ११०० पोलिसांना कोरोना ची बाधा झाल्याची माहिती गृहमंत्री यांच्याकडून दिली जाते आहे. वैद्यकीय कर्मचारी ,पत्रकार यांपैकी कोणी -किती कोरोना बाधित आहेत याबाबत मात्र कोणत्याही स्तरावरून माहिती गोळा केली जात नाही अगर दिली जात नाहीं असे स्पष्ट चित्र आहे .दरम्यान आज राज्यात एकूण क्वारंटाईन केलेल्या व्यक्ती – ६ लाख २८ हजार ९२. एवढी नोंदविली गेली आहे .
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिलेली माहिती
लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविडसंदर्भात कलम १८८ नुसार १ लाख ३४ हजार गुन्हे दाखल झाले आहेत. विविध गुन्ह्यांसाठी ८ कोटी ६४ लाख १९ हजार ८७८ रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. राज्यात ६ लाख २८ हजार व्यक्ती क्वारंटाईन करण्यात आले आहे अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.
अत्यावश्यक सेवेसाठी ५ लाख ०४ हजार ३१पास पोलिसांमार्फत देण्यात आले आहेत.
राज्यात लॉकडाऊनच्या म्हणजे दि.२२ मार्च ते १९ जून या कालावधीत
पोलिसांवर हल्ला होण्याच्या घटना – २७९ (८५८ व्यक्ती ताब्यात)
१०० नंबरवर आलेले फोन – १ लाख ०४ हजार ३५१
राज्यात एकूण क्वारंटाईन केलेल्या व्यक्ती – ६ लाख २८ हजार ९२.
अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांवर दाखल गुन्हे – १३३५
जप्त केलेली वाहने – ८४ हजार १६१
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखताना मृत्युमुखी पडलेले पोलीस – ४८
(मुंबईतील ३१ पोलीस व १ अधिकारी असे एकूण ३२, पुणे ३, सोलापूर शहर २, नाशिक ग्रामीण ३, एटीएस १, मुंबई रेल्वे २, ठाणे ग्रामीण २, जळगाव ग्रामीण१,पालघर १, जालना १)
कोरोना बाधित पोलीस – ११८ पोलीस अधिकारी व ९८२ पोलीस कर्मचारी
राज्यातील एकूण रिलिफ कँप – ९८ (सुमारे ३ हजार २३५ लोकांची व्यवस्था)