पुणे :- महापुरामुळे कोल्हापूर, सांगली आणि साताऱ्यातील लोकांना अत्यंत कठीण परिस्थितीला तोंड द्यावे लागत आहे.सर्व स्तरातून मदतीचा ओघ चालू आहे. यात खारीचा वाटा म्हणून गोयल गंगा फाऊंडेशनच्या वतीने जीवनावश्यक वस्तूंचे तसेच १५० हून अधिक ब्लँकेट्स यावेळी देण्यात आले आहेत. टूथपेस्ट,टूथब्रश,साबण, आणि दैनंदिन वापराच्या अनेक गोष्टींचे ४ बॉक्स यावेळी पाठवण्यात आल्या.
गोयल गंगा फाऊंडेशनचे विश्वस्त अमित गोयल यावेळी उपस्थित होते.ते म्हणाले कि, पूर ओसरल्यानंतर त्याठिकाणी अधिकाधिक प्रमाणात मदतीची गरज आहे.त्यामुळे सामाजिक बांधिलकी जपत प्रत्येकाने आपापल्यापरीने सर्वतोपरी मदतीसाठी पुढे येण्याचे आवाहन त्यांनी केले.