गोयल गंगा फौंडेशनच्या वतीने पर्यावरण दिन साजरा
पुणे :- दिवसेंदिवस पर्यावरणाचा समतोल बिघडत असून मोठय़ा प्रमाणावर होत असलेली वृक्षतोड, जंगलांचा नाश या बाबी त्यासाठी कारणीभूत आहेत. पर्यावरणाच्या बिघडलेल्या समतोलामुळे अनियमित पर्जन्यमान, भयानक उष्णता अशा संकटांना तोंड देणे भाग पडत आहे. यावर प्रभावीपणे मात करायची असल्यास काळाची गरज ओळखून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी मोठय़ा प्रमाणावर वृक्षारोपण व त्याचे संवर्धन करणे आवश्यक आहे अशी भावना गोयल गंगा फौंडेशनचे विश्वस्त जयप्रकाश गोयल यांनी व्यक्त केली. बावधन मधील गंगा लिजंड येथे आज पर्यावरण दिन साजरा करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.
गोयल गंगा फौंडेशनच्या वतीने प्रत्येकवर्षी पर्यावरणदिनानिमित्त असंख्य रोपांचे वृक्षारोपण करण्यात येते. यावर्षी देखील बऱ्याच रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी फौंडेशनचे विश्वस्त जयप्रकाश गोयल, अमित गोयल, नगरसेवक किरण दगडे पाटील,मुख्य अभियंता कुमार बर्डे,सीईओ किरण कुमार देवी याप्रसंगी उपस्थित होते.
ते पुढे म्हणाले कि, वनसंपदेवर मनुष्याची बरीच कामे अवलंबून असून वृक्षांचे रोपण व संवर्धन होणे महत्त्वाचे आहे.राष्ट्रीय कर्तव्य म्हणून प्रत्येकाने वृक्षारोपणाच्या या मोहिमेत सहभागी व्हावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
अमित गोयल म्हणाले कि, पृथ्वीचे संरक्षण व पर्यावरण वाचवण्याची जबाबदारी समाजातील प्रत्येक घटकाने यांना पार पाडायची असते. पर्यावरणाचे संरक्षण व त्याप्रती जागरूकता निर्माण करण्याचे महत्वाचे कार्य पार पाडावे ही आज प्रत्येकाची जबाबदारी बनली पाहिजे. ती आपण निभावली तर उद्याचे आपले भवितव्य उज्ज्वल असेल हे लक्षात ठेवायला हवे.