पुणे-देशभरातून भाजपाला रोखण्यासाठी राष्ट्रवादीचे शरद पवार राष्ट्रीय पातळीवर भाजपतेर समविचारी पक्षांचे एक संघटन बनविण्याच्या प्रयत्नात असताना त्यांच्या स्वतःच्या जिल्ह्यातून आणि राज्यातून वारंवार कॉंग्रेस पक्ष मात्र स्वबळाचा नारा देतो आहे. कॉंग्रेसच्या अनेकांचे मत आहे राष्ट्रवादीशी आघाडी केल्यानेच कॉंग्रेसची वाताहत झाली आहे . अनेक ठिकाणांहून कॉंग्रेस समूळ नष्ट झाली तिथे राष्ट्रवादी बळकट बनली आहे. यापूर्वी राज्यातून प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी स्वबळाचा नारा दिला आहे , त्यानंतर माजी गृहराज्यमंत्री तत्कालीन पुणे शहर अध्यक्ष रमेश बागवे यांनी पुण्यातून स्वबळाचा नारा दिला होता आता नवे शहर अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी देखील स्वबळावर लढण्या चाच नारा दिला आहे.
या संदर्भात शहर अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी सांगितले कि,’ पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कोअर कमिटीची बैठक काल काँग्रेस भवन येथे संपन्न झाली. या कोअर कमिटीच्या बैठकीमध्ये पुणे महानगरपालिका निवडणुकी संदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली.या बैठकीत सर्व नेते मंडळीं व कार्यकर्त्यांनी पुणे महानगरपालिका निवडणुक काँग्रेस पक्षाने स्वबळावर लढवावी अशी आग्रही मागणी केली. या मागणीनुसार निवडणुकीत काँग्रेस कार्यकर्त्यांना संधी मिळाली पाहिजे यावर चर्चा झाली. कार्यकर्त्यांच्या तसेच सर्व नेतेमंडळींच्या आग्रही मागणी नुसार येणारी पुणे महानगरपालिकेची निवडणुक काँग्रेस पक्ष स्वबळावर लाढणार आहे.आगामी निवडणुकीसाठी इच्छुकांनी व कार्यकर्त्यांनी आपापल्या भागात प्रभागाची व पक्ष संघटनेची बांधणी करण्यास सुरूवात करावी असा निर्णय चर्चाअंती सर्वांच्या समंतीने घेण्यात आला.
कॉंग्रेस ने स्वबळावर लढण्याचा एकीकडे नारा सुरु ठेवला असला तरी दुसरीकडे पक्षाला स्थानिक पातळीवर भक्कम आधार देणारे नेतृत्व नसल्याने कॉंग्रेस स्वबळावर किती लढेल याबाबत साशंक असलेली काही जण राष्ट्रवादीशी संधान बांधून आहेत . नुकतीच मार्केड यार्ड येथील निसर्ग मंगल कार्यालयात काही दिवसांपूर्वी कॉंग्रेसच्या एका माजी महापौरांनी राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची भेट घेऊन चर्चा केल्याचे वृत्त आहे. एकीकडे भाजपमधून आता पुन्हा स्वगृही परतू पाहणारे काही नगरसेवक मार्गावर असताना आता तेही कॉंग्रेस कि राष्ट्रवादी अशा साशंकेत दिसू लागले आहेत.
कॉंग्रेस आणि आप दोघेही आणणार नवे चेहरे – भाजपा आणि राष्ट्रवादीच्या आपसातील लढाईत कॉंग्रेसचे स्वबळावर येणारे तर निवडून येतील पण काही नवे चेहरे देखील कॉंग्रेसकडून विजय प्राप्त करण्याची शक्यता वर्तविली जाते आहे. आप कडून येणारे चेहरे देखील नवीन असतील .भाजपा आणि राष्ट्रवादी आपसात भांडत असताना या दोन्ही पक्षांच्या सदस्यांची संख्या वाढणे अनेकांना साहजिकच वाटते आहे.