पुणे – महाराष्ट्र सरकार अंतर्गत सुरक्षेचे नाव घेत जो माफिसा कायदा आणत आहे, तो लोकशाहीची मूल्ये पायदळी तुडविणारा असून त्याला विरोध करण्यासाठी भाजपा सरकारच्या विरोधात पुणे शहर काँग्रेसच्यावतीने भव्य मोर्चा काढण्यात आला.
या राज्यात, देशात प्रत्येकाला कशा पध्दतीने जगावे राहावे हा अधिकार आहे. हे सरकार एक ठराविक विचार या राज्यामध्ये बिंबवत आहे. त्यामुळे या कायद्याला हाणुन पाडण्यासाठी आता विरोध होत आहे. पुण्यात शहर काँग्रेसच्यावतीने शनिवार वाड्यापासून ते कौन्सिल हॉलपर्यंत मोर्चा काढण्यात आला. शहराध्यक्ष रमेश बागवे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला असुन यामध्ये माजी मंत्री चंद्रकांत छाजेड , दीप्ती चौधरी , अजित दरेकर ,उपमहापौर मुकारी अलगुडे, संगिता तिवारी, अभय छाजेड, आबा बागुल, विश्वजीत कदम कमलताई व्यवहारे ,अविनाश बागवे , सुधीर जानज्योत,विठ्ठल थोरात , मुक्तार शेख,राजेंद्र भुतडा, विलास वाडेकर, वीरेंद्र किराड , शेखर कपोते , रजनी त्रिभुवन ,गोपाळ तिवारी, बाळासाहेब अमराळे,विक्रम खन्ना , आणि कार्यकर्ते मोठया संख्येने सहभागी झाले होते.