पुणे- येत्या शुक्रवारी ८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची सभा भवानी पेठेत आयोजित करण्यात आली आहे.
केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात जनमत तयार करण्यासाठी राज्यात काँग्रेस पक्षानेजनसंघर्ष यात्रा काढली होती. त्याच पाठोपाठ महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने राज्यात५० ठिकाणी ‘जनसंघर्ष’ सभा आयोजित करण्यात आल्या आहेत. त्याची सुरवात पुण्याहून होणारआहे. गेल्या साडेचार वर्षात केंद्रातील मोदी व राज्यातील फडवणीस सरकारने लोकांच्या अपेक्षा
भंग केल्या. नोटबंदीमुळे संपूर्ण देशात मंदीची लाट पसरली. मोठे कारखानदार, व्यापारी, छोटेदुकानदार आणि शेतकरी यांना याचा मोठा फटका बसला. जी.एस.टी. चूकीच्या पध्दतीने लागूकेली, त्यामुळे व्यापारी आणि ग्राहकांना त्याचे दुष्परिणाम भोगावे लागत आहे. राफेल विमानखरेदीमध्ये भ्रष्टाचार करून संयुक्त संसदिय समिती नेमण्यास भाजप सरकार तयार नाही. सन२०१४ च्या निवडणुकीत सत्तेत येण्यासाठी भाजपने आपल्या जाहिरनाम्यात आणि भाषणात
सांगितले की, काळा पैसा देशात परत आणू आणि प्रत्येक नागरिकाच्या बँक खात्यात १५ लाखरूपये जमा करू. सत्तेत आल्यावर दरवर्षी दोन कोटी रोजगार देऊ असे सांगितले होते. राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारने केलेल्या तुरडाळ घोटाळा, चिक्की घोटाळा या सारख्या अनेक घोटळ्यांनी व प्रचंड प्रमाणात झालेल्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. दिल्लीपासून
गल्लीपर्यंत एक हाती सत्ता असून या भाजप सरकारला देश चालविता येत नाही. सामाजिक सलोखा उध्दस्त करण्याचे काम भाजप सरकार करीत आहे. सर्वच स्तरावर हे सरकार अपयशी ठरले आहे.
या सरकारचा खरा चेहरा उघड करण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने ‘जनसंघर्ष’ सभेचे आयोजन शुक्रवार दि. ८ फेब्रुवारी २०१९ रोजी छाया टॉकीज येथे, पेस्तंजी दवाखान्याजवळ, भवानीपेठ, पुणे येथे सायं. ५.०० वा., करण्यात आले आहे.
या सभेस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खासदार अशोकचव्हाण,
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, पक्षाचे ज्येष्ठ नेते व पदाधिकारी उपस्थित राहणारआहेत असे या पत्रकाद्वारे पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे यांनी सांगितले आहे.