पुणे- हुकुमशाही केंद्र सरकार विरूध्द एल्गार म्हणून शेतकरी बचाओ आंदोलन सुरु केलेल्या कॉंग्रेस पक्षाच्या वतीने नेते कार्यकर्ते पुण्यात शेतकऱ्याच्या व्यवसाय स्थळी ,किंवा शेतावर जाऊन शेतकरी विधेयकाला विरोध म्हणून स्वाक्षरी घ्यायची मोहीम राबवत आहेत . सुमारे 2 कोटीहून अधिक स्वाक्षऱ्या गोळा करण्याचा निर्धार या मोहिमेंतर्गत करण्यात आला आहे.
आज मार्केटयार्ड येथे शहर काँग्रेस तर्फे हि मोहीम राबवण्यात आली याप्रसंगी आबा बागुल(गटनेते पुणे मनपा),अभय छाजेड,कमलव्यवहारे आणि पर्वती काँग्रेस चे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.