बारामतीमध्ये ही जनादेश यात्रा गेली. तेथे मुख्यमंत्र्यांनी पवारांवर टीका सुरु करताच राष्ट्रवादी समर्थकांनी घाेषणाबाजी सुरु केली. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला हाेता. याबाबत बाेलताना मुख्यमंत्री म्हणाले, काल विराेध करणारे राष्ट्रवादीचे सात ते आठ लाेक हाेते. बारामतीमध्ये पवारांशिवाय काेणी सभा घेऊ नये का, तिथे काय कलम 370 लागू केले आहे का, की बारामती महाराष्ट्राच्या बाहेर आहे ? लाेकशाहीमध्ये सर्वांना सभा घेण्याचा अधिकार आहे. पवारांच्या प्रत्येक सभेत आमच्या सात ते आठ कार्यकर्त्यांनी घाेषणाबाजी केली तर चालेल का ? पवारांनी आमच्या इकडे यावं, सभा घ्यायला आम्ही त्यांना मदत करु असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.तसेच पवारांच्या एवढी काय पायाखालून जमीन सरकतीये की बारामतीमध्ये मुख्यंमत्र्यांनी सभा घेऊ नये असे त्यांना वाटते असा टाेलाही त्यांनी यावेळी पवारांना लगावला.
पुण्यातील पाणी नियोजन व्हायचेय
इंदापूरला आपण पाणी देणार आहोत .पुण्यात पाणी असूनही लोकांना येथे पाणी मिळत माही अशा तक्रारी आहेत यावर बोलताना ते म्हणाले , कि पुण्यात पाण्याचा वापर जास्त आहे आणि अपव्यय देखील होतो आहे . या साठी नियोजन करणे गरजेचे आहे २४ तास पाणी पुरवठा योजना हेच काम निश्चित करणार आहे . हि योजना पूर्ण झाल्यावर पुण्यात पाण्याचा प्रश्न शिल्लक राहणार नाही