पुणे (दि. 27) : महाराष्ट्रातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र्र आपत्कालिन वैद्यकीय मदत सेवा (डायल १०८) हीमुंबईसारख्या ठिकाणी अत्यंत उपयुक्त ठरत आहे. या सेवेतील कर्मचारी कोरोनायोद्धे आहेत. त्यापैकी अनेकांनाकोरोनाची बाधा झाली होती. मात्र, कोरोनामुक्त होऊन त्यांनी पुन्हा सेवा सुरु केलेली आहे. त्यांच्या या उदंडउत्साहातून मानवतेचं दर्शन घडतं, अशा शब्दांत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी डायल १०८ सेवेबद्दल कौतुकोद्गार काढले.
राष्ट्रीय आरोग्य अभियान, महाराष्ट्र शासनाचा सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्यावतीने महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र आपत्कालिन वैद्यकीय मदत सेवा राबविली जाते. ही सेवा भारत विकास समूहाद्वारे संचलित केली जाते. या सेवेच्या नियंत्रण कक्षाला नुकतीच टोपे यांनी भेट दिली. यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, “आधुनिक तंत्रज्ञान आणि कार्यपद्धतींवर आधारलेली महाराष्ट्र आपत्कालिन वैद्यकीय मदत सेवा महाराष्ट्रात मोलाचे कार्य करत आहे. आतापर्यंत
४९ लाख २२ हजार ९३६ रुग्णांना उपचार करण्याचे आणि व्यवस्थितपणे रुग्णालयात पोहोचविण्याचे काम या सेवेच्या माध्यमातून झालेले आहे. जवळपास ३५,२६१ बाळांचा जन्म या सेवेच्या रुग्णवाहिकेत झालेला आहे. या सेवेचा लाभ घेण्यासाठी आतापर्यंत जवळपास एक कोटीहून अधिक फोन कॉल्स प्राप्त झालेले आहेत. चांगली आरोग्य सेवा देणे ही आजच्या काळाची गरज आहे.”