आठ दिवसांत बेकायदेशीर दु चाकी वाहतूक बंद न झाल्यास चक्काजाम आंदोलन : बाबा कांबळे
बेकायदेशीर टू व्हीलर बाबत कठोर कारवाई करण्याचे आदेश शिंदे यांच्या आश्वासना नंतर आंदोलन तात्पुरते स्थगित
30 नोव्हेंबर पर्यंत रिक्षा मीटर कॅरीबॅॅशनला मुदतवाढ
पिंपरी / प्रतिनिधी
बेकायदेशीर दुचाकी वाहतूक बंद करण्याबाबत वारंवार निवेदन, पत्रव्यवहार, आंदोलन करण्यात आले आहे. मात्र अद्याप त्यांच्यावर रीतसर बंदची कारवाई करण्यात आली नाही. येत्या आठ दिवसांत नियमबाह्य दुचाकी वाहतुकीवर बंदची कारवाई न केल्यास महाराष्ट्रभर चक्काजाम आंदोलन छेडू, असा संतप्त इशार महाराष्ट्र रिक्षा पंचायत व ऑटो रिक्षा टॅक्सी ट्रान्सपोर्ट फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष बाबा कांबळे यांनी दिला.
दिवाळी सुट्टीनंतर गुरुवारी (दि. 27) पहिला दिवस आरटीओचे कामकाज सुरू झाले. मात्र रिक्षा चालक मालकांनी आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी कार्यालयावर तीव्र आंदोलन करून तीन तास अपेक्षा अधिक काळ आरटीओचे कामकाज बंद पाडले. यानंतर आधी शिंदे संजय भोर यांनी शिष्टमंडळाची चर्चा करून कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन दिले व 30 नोव्हेंबर पर्यंत रिक्षा मीटर कॅरीबॅॅशनला मुदतवाढ दिले या वेळी बाबा कांबळे बोलत होते.
या आंदोलनात, पुणे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण शेलार, पुणे शहराध्यक्ष शफिकभाई पटेल, कार्याध्यक्ष विलास खेमसे, मुरार काजी,अन्सार शेख, माजी पुणे जिल्हा अध्यक्ष नितीन शिंदे, कुमार शेट्टी, मोहम्मद शेख, अविनाश वाडेकर, किरण एरंडे, तोफिक कुरेशी, शाहरुख खान, महालिंग स्वामी, संजय दौंडकर,उपस्थित होते.
बाबा कांबळे म्हणाले की, रिक्षा चालक मालक एवढे आक्रमक होण्याची कारणे अनेक आहेत. गेल्या काही दिवसापासून बेकादेशीर दुचाकी वाहतूक सर्रासपणे सुरू आहे. यामुळे रिक्षा व्यवसायावरती परिणाम झाला आहे. त्यांच्यावर उपासमारीचे वेळ आली आहे. यामुळे अचानकपणे रिक्षाचालकाने आरटीओ कार्यालयावर चक्काजाम आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. आरटीओच्या दारातच ठिय्या मारून आरटीओचे कामकाज बंद पाडले. येत्या आठ दिवसांत योग्य निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा बाबा कांबळे यांनी दिला.
यानंतर पुणे आरटीओचे प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांनी शिष्टमंडळाला चर्चा करण्यासाठी बोलवले. त्यांच्यासोबत झालेल्या चर्चेनुसार त्यांनी ओला, उबेर दुचाकीवरती कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. दोन दिवसात आम्हाला वेळ द्या, मी दोन दिवसांमध्ये कठोर कारवाई करून तुम्हाला न्याय देऊ असे, त्यांनी सांगितले.
परिवहन अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर रिक्षा चालक मालकांनी आंदोलन तात्पुरते मागे घेतले.