पुणे- कात्रज कोंढवा रस्त्यावरील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी आपण महापालिकेच्या सहाय्याने उभारलेल्या पाण्याचे टाकीचे उद्घाटन जे आज होणार होते त्याची तारीख पाहूनच राष्ट्रवादीला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटविल्याचे श्रेय मिळू नये आणि आपण आंदोलन केल्याने , पाण्याचा प्रश्न मार्गी लागला असा आभास निर्माण करण्यासाठीच भाजपचे माजी आमदार टिळेकर यांनी दिशाभूल करून कार्यकर्त्यांना चिथावणी देऊन कायदा हातात घेऊन आंदोलन केल्याचा आरोप राष्ट्रवादी चे नगरसेवक प्रकाश कदम यांनी केला आहे.महापौर यांनी आज होणारे पाण्याच्या टाकीचे उद्घाटन याच राजकीय श्रेयवादातून पुढे ढकलून येथील लोकाना पाणी देण्याचे कामास दिरंगाई केल्याचा ठपका हि त्यांनी महापौर यांच्यावर ठेवला आहे. ते म्हणाले ,’ माझ्या सौभाग्यवती भारती कदम या नगरसेविका असताना पाण्याच्या टाकीच साठी आर्थिक तरतूद करून टाकीचे काम सुरु करण्यात आले. हि टाकी झाल्यास या भागातील लोकांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागेल म्हणून राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी भूमिपूजन केलेल्या ठिकाणी आपण राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या मदतीने हि टाकी पूर्णत्वास आणली . आणि महापौरांनी या टाकीचे उद्घाटन आज दिनांक ९ ऑक्टोबर रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत करण्याचे ठरविले हे समजताच भाजपचे माजी आमदार यांनी स्वारगेट पाणीपुरवठा केंद्र येथे आंदोलन केले . नुसते निवेदन दिल्यावर काही गुन्हा दाखल होत नाही किंवा अटक होत नाही पण लक्ष वेधून घ्यावे म्हणून राजकीय स्टंट म्हणून इथे काही थोडीफार तोडफोड करण्याचा यत्न केला . तो केवळ लोकांचे लक्ष वेधून घेण्यासाठीच होता. आणि आपल्या या आंदोलनामुळे टाकी कार्यरत होऊन पिण्याचे पाणी मिळू लागले असे दाखविण्याचा केविलवाणा प्रयत्न होता. पण या प्रयत्नात त्यांना अटक झाली आणि तब्बल १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळाली . ते पाहून , आता या कार्यक्रमास आपले स्थानिक नगरसेवक उपस्थित राहू शकणार नाहीत हे लक्षात आल्याने ७ तारखेला महापौरांनी या टाकीच्या उद्घाटनाचा कार्यक्रम रद्द करून पुढे ढकलला . या सर्व राजकीय लुट मारीत निव्वळ आमच्या कामाचे श्रेय लाटण्याचा तर प्रयत्न झालाच पण महापौरांच्या स्वार्थी निर्णयाने टाकी चे टाकीचे उद्घाटन पुढे ढकलल्याने या भागात आज मिलाणारे पाणी हिसकावले गेले. आणि ते नागरिकांपासून अजून दूरवर नेऊन ठेवण्यात आले. भाजपचे हे कारस्थान ,षड्यंत्र याचा आपण निषेध करतो . असे ते म्हणाले.