पुणे-:’केंद्र सरकार ने राज्याला भरगोस निधी देऊन ही राज्य सरकार बारा बलुतेदारांना कुठल्याही प्रकारची मदत करत नाही हे अतिशय दुर्दवी आहे सरकार बारा बलुतेदारांना हेतुपुरस्सर डावलत आहे त्या मुळे जो पर्यंत सरकार आर्थिक पॅकेज जाहीर करत नाही तोपर्यंत आंदोलन करणार ‘असल्याचे प्रतिपादन खासदार गिरीश बापट यांनी केले.भारतीय जनता पार्टी पुणे शहराच्या वतीने शहराच्या आठही मतदारसंघात आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते याचा एक भाग म्हणून भारतीय जनता पार्टी कसबा मतदारसंघाच्या वतीने आज कसबा गणपती मंदिरासमोर आंदोलन करण्यात आले बापट पुढे म्हणाले मागील सरकार ने बारा बलुतेदारांना न्याय दिला ती गोष्ट आघाडी सरकारच्या काळात होत नाही बारा बलुतेदारांना या सरकार ने वाऱ्यावर सोडल्याचे चित्र दिसत आहे या सरकार ला जाग आणल्याशिवाय तसेच आर्थिक पॅकेज जाहीर केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही ही ग्वाही बापट यांनी दिली यावेळी खासदार गिरीश बापट भा ज प चे शहराध्यक्ष जगदीश मुळीक ,संघटन सचिव राजेश पांडे महाराष्ट्र प्रदेश युवा मोर्चा उपाध्यक्ष स्वरदा बापट सरचिटणीस राजेश येनपुरे गणेश घोष स्थायी समिती चे अध्यक्ष हेमंत रासने सभागृह नेते धीरज घाटे व अन्य नगरसेवक उपस्थित होते या आंदोलनाचे आयोजन संजय देशमुख ,छगन बुलाखे ,राजू परदेशी अमित कंक राजू काकडे गणेश पाचेरकर ,उमेश चव्हाण अजय तांबट भासमराज तिकोने,पुष्कर तुळजापूरकर यांनी केले या वेळी बारा बलुतेदारांचे प्रतिनिधी तसेच तुळशीबाग व्यापारी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते