पुणे-महापालिकेच्या अर्थसंकल्पात सुचविण्यात आलेल्या नगर रस्ता वाहतूक आराखड्याअंतर्गत पाच उड्डाणपुलांपैकी गोल्फ चौकातील उड्डाणपुलाचा सल्लागार कंपनीकडून प्रकल्प अहवाल प्राप्त झाला असून, निविदा प्रकि‘या सुरू करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी भूमिपूजन करुन काम सुरू करण्यात येईल अशी माहिती आमदार जगदीश मुळीक यांनी दिली.
केंद्र सरकारच्या रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत गेल्या वर्षी शहरातील २०० किलोमीटर रस्त्यांचे सुरक्षाविषयक सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यात पुणे-नगर रस्ता वाहतुकीसाठी सर्वांत धोकादायक असल्याची बाब समोर आली होती. याचा विचार करून नगर रस्ता हे एक एकक मानून नगर रस्ता एकात्मिक वाहतूक आराखडा तयार करण्यात आला होता. यामध्ये गोल्फ चौक, खराडी, येरवडा शास्त्रीनगर, विश्रांतवाडी या ठिकाणी उड्डाणपुल उभारण्यात येणार आहेत. या उड्डाणपुलांच्या जागांची पाहाणी केल्यानंतर आमदार मुळीक बोलत होते.
महापालिकेचे प्रकल्प मुख्य अभियंता श्रीनिवास बोनाला, अधिक्षक अभियंता जगदीश खानोरे, वाहतूक उपायुक्त पंकज देशमुख, पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष योगेश मुळीक, नगरसेवक अनिल टिंगरे, शीतल सावंत, सुनीता गलांडे, शीतल शिंदे, नाना सांगडे, संदीप जर्हाड, राहुल भंडारे, श्वेता गलांडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
आमदार मुळीक पुढे म्हणाले, ‘स्थायी समितीचे माजी अध्यक्ष योगेश मुळीक यांनी गेल्या वर्षीच्या महापालिकेच्या अंदाजपत्रकात नगर रस्त्यावरील वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी वाहतूक आराखडा प्रस्तावित केला होता. त्यासाठी अंदाजपत्रकात सुमारे ९२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. गोल्ङ्ग चौकातील प्रकल्पासाठी तज्ज्ञ सल्लागार म्हणून सी. व्ही. कांड यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी सुचविल्याप्रमाणे डिझाईन व नकाशे तयार करण्यात आले होते. त्यांचा अहवाल प्रशासनाला प्राप्त झाला आहे. निविदा प्रकि‘या सुरू करण्यात आली आहे. येत्या महिन्यात उड्डाणपुलाचे भूमिपूजन करण्यात येणार आहे.’
आमदार मुळीक पुढे म्हणाले, ‘गोल्फ चौकातील उड्डाणपुलाचा गेली पाच वर्षे पाठपुरावा करीत आहे. गोल्ङ्ग चौकातून गुंजन टॉकीज, विमानतळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, शास्त्रीनगर या परिसरातून दररोज सरासरी ९१ हजार दुचाकी, ४९ हजार चारचाकी आणि सात हजार ३०० ट्रक वाहतूक करीत असतात. आय. आर. सी. स्पेसिङ्गिकेशन प्रमाणे या चौकात उड्डाणपुल निर्माण करणे आवश्यक होते. नजिकच्या काळात अन्य चार ठिकाणी उड्डाणपुलाचे प्रकल्पांचा शुभारंभ करण्यात येणार आहे. त्यामुळे नगर रस्त्यावरील वाहतुकीची कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे.’