पुणे-भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त काँग्रेस भवन येथे अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते. अभिवादन सभे आगोदर काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार, माजी आमदार अनंतराव गाडगीळ, दिप्ती चवधरी, ॲड. अभय छाजेड यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी अभिवादनपर मनोगत व्यक्त करताना उल्हास पवार असे म्हणाले की, ‘‘डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी घटना समितीची रचना करण्यासाठी ज्यांनी जास्त हालअपेष्ठा सहन केल्या आहेत अशा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर घटना समितीचा मसुदा तयार करण्याची जबाबदारी दिली होती. आपले भाग्य आहे की डॉ. बाबासाहेबांनी पुणे जिल्ह्यातील तळेगाव येथे तीन ते चार महिने वास्तव्य करून घटना समितीचा मसुदा तयार केला होता.’’
यानंतर माजी आमदार अनंतराव गाडगीळ म्हणाले, ‘‘घटना समितीत काकासाहेब गाडगीळांचा समावेश होता. कश्मिर प्रश्न व अन्य प्रश्नांसाठी डॉ. बाबासाहेबांचे योगदान मोठे आहे.’’
त्यानंतर माजी आमदार दिप्ती चवधरी म्हणाल्या की, ‘‘मागासवर्गीय समाजासाठी संसद ते रस्त्यावर आवाज उठविणारे त्याचप्रमाणे सर्व घटकांचा विचार करून राज्यघटना लिहिणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य पुढच्या पिढीने पुढे नेण्याची गरज आहे.’’
यानंतर प्रदेश चिटणीस संजय बालगुडे म्हणाले की, ‘‘आर.बी.आय. ची स्थापना शेती, पाणी यावर डॉ. बाबासाहेबांनी अनेक प्रबंध लिहिले व अमलात आणले.’’
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुणे शहर सरचिटणीस सुजित यादव यांनी केले तर आभार मेहबुब नदाफ मानले.
यावेळी नगरसेवक अजित दरेकर, कमल व्यवहारे, पुजा आनंद, द. स. पोळेकर, संदिप मोरे, सुनिल घाडगे, सतिश पवार, गुलाम खान, सचिन सुडगे, मंगेश निरगुडकर, मनोज पवार, भगवान कडू, बाळासाहेब मारणे, पपिता सोनावणे, ज्योती परदेशी, ॲड. अश्विन गवारे, ॲड. रेश्मा शिकलगार, सोनिया ओव्हाळ, संदिप कांबळे, ईश्वर गायकवाड, अनिस खान, चंद्रकांत नार्वेकर, हरिदास अडसूळ, गणेश काकडे, भारत इंगुले, फैय्याज शेख आदींसह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.