पुणे : हिंदू धर्मात अंत्यसंस्कारानंतर मृत व्यक्तीच्या अस्थींचे विसर्जन केले जाते, तरचआत्म्यास मोक्ष प्राप्ती होते अशी धारणा आहे. परंतु अपघात किंवा इतर कोणत्याहीकारणाने रस्त्यांवर अनेक जण मृत्युमुखी पडतात काही मृतदेहांची ओळख पटवणे देखीलअवघड असते त्यामुळे हे मृतदेह बेवारस अवस्थेतच राहतात. मृत व्यक्तीची जात-धर्म न पाहता माणूसकीच्या भावनेतून अशा बेवारस मृतदेहांच्या अस्थींचे विसर्जन करण्यात आले.
राष्ट्रीय कला अकादमी आणि पुणे महानगरपालिका ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने सर्वपित्री अमावस्या निमित्त ८० बेवारस अस्थींचे विसर्जन नदीत करण्यात आले. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर संगम घाटावर या अस्थींचे विधिवत पूजन देखील करण्यात आले. यावेळी मंदार रांजेकर, रोमा लांडे, अतुल सोनावणे, योगेश गोलांडे, सदाशिव कुंदेन, सामाजिक कार्यकर्ते डाॅ. मिलिंद भोई, बाला शुक्ला, राजू बलकवडे, संगीता ठकार अमर लांडे, विवेक टिळे ,किरण फाळके, सुरज लेकावळे उपस्थित होते. उपक्रमाचे यंदा १२ वे वर्ष आहे. यावेळी सदाशिव कुंदेन यांच्या हस्ते अस्थींचे पूजन करण्यात आले.
मंदार रांजेकर म्हणाले, राष्ट्रीय कला अकादमीच्या वतीने दरवर्षी सर्वपित्री अमावस्येला बेवारस मृतांच्या अस्थींचे विधिवत पूजन व विसर्जन केले जात असून या उपक्रमाचे हे बारावे वर्ष आहे. पुण्यामध्ये अनेक बेवारस मृतदेह येतात त्यांचे कोणीही नसते. त्यामुळे त्यांचे अंतिम विधी होत नाहीत. अशा मृतांच्या अस्थी विसर्जित करून त्यांना शांती लाभण्यासाठी सर्वपित्री अमावास्येला या अस्थी विसर्जित केल्या जातात.