पुणे- कोरोनाच्या वाढत्या संक्रमणाला तोंड देताना निष्क्रिय,दुरावस्थेला जबाबदर अधिकारी असा ठपका ठेवीत महापालिकेतील सहायक आरोग्य प्रमुख डॉ. अंजली साबणे यांची पदावरून हकालपट्टी करण्यासाठी सत्ताधारी भाजपमधील एका गटाने हालचालींना प्रारंभ केला आहे. स्वीकृत नगरसेवक असलेले पण पक्षात आपला दबदबा तयार करून ठेवलेले गणेश बिडकर यांच्यासह महापालिका कामगार युनियन ची मोट आपल्या हाथी ठेऊ इच्छिणारे राजेंद्र शिळीमकर आणी महापौर पदाच्या शर्यतीत कायम ज्यांच्यावर अन्याय झाला त्या वर्षा तापकीर यांनी यासंदर्भात स्थायी समितीकडे प्रस्ताव दिला आहे .जो येत्या १५ तारखेला होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत मांडला जाणार आहे .
शहरातील अपुऱ्या वैद्यकीय सुविधा ,जम्बो सेंटर मधील जम्बो अपुऱ्या सुविधा ,अंशदायी योजनेत गोंधळ,उपलब्ध बेड ची माहिती घेण्यात अनियमितता याबाबत उत्तरे न देणे , नगरसेवकांचे फोन न घेणे असे आरोप त्यांच्यावर ठेवीत त्यांच्यामुळे नागरिकांना गंभीर परिणाम भोगावे लागत असून महापालिकेची प्रतिमा खराब होत असल्याचे या प्रस्तावात म्हटले आहे.
एकीकडे शेखर गायकवाड यांनी सुरुवातीला आयुक्तपदाच्या कारकिर्दीत कोरोनावर आक्रमण करण्यासाठी आपली नीती आखून कार्यवाही सुरु केली असताना त्यांची अचानक पूर्वस्थानी म्हणजे साखर आयुक्त पदावर राज्य सरकारने बदली केली . त्यानंतर त्यांच्या जागेवर विक्रम कुमार यांची आणि सौरव राव यांची विभागीय आयुक्त पदांवर नियुक्ती करण्यात आली दरम्यान पुण्याला जिल्हाधिकारी देखील नवे मिळाले . पाच सहा आय ए एस अधिकारी पुण्याला कोरोनावर आक्रमण करण्यासाठी देण्यात आल्या आणि नागरिकांकडून,वाहन चालकांकडून दंड वसुलीत १ नंबर असलेल्या पोलीस आयुक्तांना मात्र येथेच कायम ठेवण्यात आले. ना शेखर गायकवाड यांची बदली करून कोरोना ची तीव्रता कमी झाली , ना पोलिसांकरवी कारवाया करून कोरोनाची तीव्रता कमी झाली . ना जम्बो रुग्णालय पीएम आर डीए मार्फत लाईफ लाईन ला देऊन तिथे सुविधा निर्माण झाल्या . कोरोनासाठी नेमलेल्या असंख्य आय ए एस अधिकारी सेनापती असलेल्या टीम चा पडलेला उजेड लख्खपणे दिसून आला . १२ लाखाची १ देवदूत मोटार १ कोटीला खरेदी करणाऱ्या या आय ए एस लॉबी ने ना पुरेशा आम्ब्युलंस ना पुरेशा शव वाहिका खरेदी केल्या. ना आम्ब्युलांस साठी कोणत्या राजकीय पक्षाची मदत घेतली ना उद्योजकांची … जिथे ज्यांच्या आधिपत्याखाली आरोग्य सेविकांची कायम आर्थिक पिळवणूक होत राहीली , बेरोजगारांना बोगस कामगार म्हणून कायम राबविले गेले .आणि ज्यांना हे सारे मोठ्या कौतुकाचे काम वाटले . तिथे ,अशी मंडळी आता डॉ. अंजली साबणे यांचा ‘बळी ‘ द्यायला निघाली कि काय ? अशी शंका यावी अशी स्थिती दिसते आहे.