पैशाअभावी अत्यवस्थ रुग्णाला डिस्चार्ज -घरीच झाला मृत्यू -अन अंत्यसंस्काराची झाली परवड
आम्ही त्या रुग्णालयाचे स्थानिक लोकप्रतिनिधीकडून बरेच कौतुक ऐकले होते , महापालिकेने याच रुग्णालयास बरीच बिले अदा देखील केली . मग अशी हि दुर्दैवी कथा आणि व्यथा पुंन्हा आमच्यापुढे का यावी ? हाच पडलेला प्रश्न होता . पण अखेरीस तोही कॉंग्रेसच्या एका जबाबदार घराण्यातील तरुणाने पुढे मांडलेला .कोरोना महामारीच्या काळात तशा खाजगी -सरकारी हॉस्पीटलच्या , व्यापारी ,दुकानदार आणि सोसायट्यांचे मालक बनून उभारलेले पदाधिकारी यांची अनेक चांगली वाईट रूपे पुढे आली . महामारीच्या या काळात माध्यमे देखील संकटात होतीच ,सामाजिक अवहेलनेचे राक्षसी रूप माध्यमांपुढे देखील उभे होतेच. वास्तविक पाहता ती सर्वच प्रकर्षाने मांडण्यात माध्यमांना सामाजिक भान राखण्याच्या दडपणाखाली मर्यादा येत राहिल्या असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही .
कॉंग्रेसचे गटनेते ज्येष्ठ नगरसेवक आबा बागुल यांचे सुपुत्र अमित बागुल कोरोना वर मात करून परतल्यानंतर हि कोरोनाग्रस्तांच्या मदतीला धाऊन जाताना त्यांना आलेला हा अनुभव मोठा हृद्यदायी ,आणि संताप आणणारा हि आहे ..जो आम्ही येथे जसाच्या तसा सादर करतो आहे .
व्यथा आहे हि दक्षिण पुण्यातील ….
…धनकवडी येथे 10 जणांचे कुटुंब वास्तव्यास असून 6 दिवसांपूर्वी घरातील जेष्ठ आजोबांना ससून येथे कोरोना असल्यामुळे ऍडमिट करण्यात आले.दुर्दैवाने त्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.महानगरपालिकेने घरातील इतर सदस्यांचे कोरोनाचे नमुने घेतले त्यापैकी 5 जण पॉझिटिव्ह आले,त्यातील तीन महिलांना हमी पत्र दिल्या नंतर घरामध्ये क्वारंटाईन करण्यात आले व दोन जणांना सिंहगड हॉस्टेल येथे क्वारंटाईन सेंटर येथे ठेवण्यात आले.परंतु घरामध्ये क्वारंटाईन केलेल्या पैकी रंजना (वय 67) वर्ष यांना अचानक त्रास सुरू झाला त्यामुळे कोरोना झालेल्या या आजींना धनकवडी मधील खाजगी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आले. त्यांना त्या ठिकाणी व्हेंटिलेटर बेड पाहिजे होता त्या साठी हॉस्पिटलकडून त्यांच्या घरच्यांना वारंवार पैसे भरण्यासाठी सांगण्यात येत होते. अचानक पैसे कुठून आणणार आणि घरातील कर्ते पुरुष माणसे सुद्धा ऍडमिट असल्यामुळे त्यांच्या कडे हॉस्पिटला भरायला पैसे नव्हते हॉस्पिटल रुग्णांबरोबर योग्य वागणूक देत नसून पैशासाठी मागणी करत आहेत. घरातील कर्ते पुरुष क्वारंटाईन असल्याने पैसे भरू शकत नाहीत त्यांच्या नातेवाईकांनी हॉस्पिटलला विनंती केली.कोणत्या सरकारी योजनेमधून यांच्यावर उपचार करता येतात का ते पहा,परंतु हॉस्पिटलच्या प्रशासनाने त्यांचे काहीच ऐकले नाही.आता आजींना ऍडमिट करून संध्याकाळ झाली आणि हॉस्पिटल कडून पैसे भरण्यासाठी दबाव वाढत होता.त्यातच आजींचे ऑक्सिजन कमी झाल्याने ऑक्सिजन लावण्याची वेळ आजींवर आली होती.हॉस्पिटलने सांगितले आताच्या आता 80,000 रुपये भरा नाहीतर पेशंटला घेऊन जा ऑक्सिजन बेड एकच असून पैसे भरले नाहीतर तो बेडही मिळणार नाही.शेवटी नाईलाजास्तव पैसे नसल्यामुळे या हॉस्पिटलने आजींना कोरोना असताना देखील डिस्चार्ज दिला. आजींना घरी आणले. परंतु घरामध्ये सकाळी 6 च्या सुमारास दुर्दैवाने त्यांचा कोरोनामुळे मृत्य झाला. ह्या सगळ्या घटने मुळे त्या कुटुंबाला काय करावे हे सुचत नव्हते कोरोनामुळे मृत्यू झाल्यामुळे त्यांना इतर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करता येत नव्हते.अश्या कठीण प्रसंगात त्यांनीअमित बागुल ह्यांना फोन करून सगळी घटना सांगितली त्या वेळेस लगेच पुणे महानगरपालिकाचे सर्व अधिकारी यांना फोन करून या घटनेची माहिती देऊन त्या आज्जीची अंत्यसंस्कार कश्या पद्धतीने करता येइल ह्या बाबत सूचना दिल्या व त्याच बरोबर त्या कुटुंबाच्या सदस्य यांच्या बरोबर फोन वर चर्चा देखील चालू होती जसा जसा वेळ जाऊ लागला रात्रीचे 12 वाजले आज्जी जाऊन 6 तास झाले होते शेवटी रात्री 12 वाजता आरोग्य प्रमुख डॉ. वावरे साहेब वॉर्ड ऑफिसर देशमुख साहेब dsi भालेराव यांना अमित बागुल ह्यांनी पुन्हा संपर्क करून त्या आज्जीना लवकर अंत संस्कार करण्यासाठी घेऊन जाण्यासाठी यंत्रणा लगेच पाठवण्यासाठी सुनावले कोरोना रुग्णांसाठी आर टीओ येथील कैलास स्मशानभूमी येथे पुणे महानगरपालिकाने ठेकेदार नेमले आहेत ते देखील आले नाहीत शेवटी वॉर्ड ऑफिसर देशमुख आणि dsi भालेराव यांनी दुसरी व्यवस्था करून रात्री 2 वाजता त्या आज्जींवर अंत्यसंस्कार करण्यात आले जीवनासाठी संघर्ष करणाऱ्या या आजींना आता मृत्यू नंतरही अंत्यविधीसाठी या जीवघेण्या व्यवस्थेशी झुंज द्यायची आली आहे. अशी वेळ कोणावर येऊ नये हीच ईश्वर चरणी प्रार्थना. यामुळेच असे वाटते की, कोरोनाच्या या बाजारात पैसा झाला माला माल.