पुण्याच्या आरोग्य व्यवस्थेबाबतच्या तक्रारींनी आता अनेकांचे कान विटले …
पुणे- कोरोनाबाबत पुण्याच्या आरोग्य व्यवस्थेबाबतच्या तक्रारींनीआता राजकीय ,शासकीय ,सामाजिक क्षेत्रातील सर्वांचेच कान विटले असून राज्य सरकारने कोरोनाला रोखण्यासाठी नियुक्त केलेली आय ए एस अधिकाऱ्यांची फौज कुचकामी आणि दिखाऊ ठरल्याचे स्पष्ट झालेले आहे. अशा परीस्थितीत देखील गोरगरीब जनतेला ,मध्यमवर्गीयांना वेठीस धरण्याची कामे पोलीस आणि महापालिका प्रशासनातील काही धेंडांकडून होताना दिसत आहे .
दादा ससून रुग्णालयात हि रुग्ण घेत नाहीत हो … त्यांच्याच कार्यकर्त्यांची पुन्हा तीच तीच गाऱ्हाणी
दरम्यान आज उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या आढावा बैठकीत पुणे शहरातील वाढत्या कोरोना विषाणू चा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याने अनेकांना दवाखान्यात बेड्स उपलब्ध होत नाही काहींना व्हेंटीलेटर, अँब्यूलन्स उपलब्ध होत नाही ऑक्सिजन बेड्स उपलब्ध नाही अशा परिस्थितीत अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहे. आजची परिस्थिती अशी आहे की गेले अनेक दिवसांपासून ससुन रूग्णालयात कोरोनाचे रूग्ण घेत नाही ऑक्सिजन व व्हेंटीलेटर तुटवडा आहे असे कारण देत नाकारले जाते आहे त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे फार मोठ्या प्रमाणात समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. यासाठी ससुन रूग्णालयात नविन रूग्ण उपचारासाठी दाखल करून घेणे आवश्यक आहे. अशी मागणी खुद्द राष्ट्रवादीच्या आणि महापालिकेतील विपक्ष नेत्या दिपाली धुमाळ यांनी केली आहे.
पुणे मनपा च्या डॅश बोर्ड वर खाजगी दवाखान्यात बेड्स उपलब्ध नाही असे दिसते परंतु प्रत्यक्षात मात्र बेड्स रिकामे असतात जर खाजगी रूग्ण या दवाखान्यात गेला तर त्यांना त्वरीत बेड्स उपलब्ध होतात. यासाठी प्रशासनाने अशी दवाखान्यातील ऐशी टक्के बेड्स आपल्या ताब्यात घेणे गरजेचे आहे. खरे तर याबाबतचे सर्व असे आदेश असतानाही अशी मागणी त्यांना करावी लागली आहे.
कोरोना व्यतिरिक्त असणारे रूग्णांना काही खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करून घेणे आवश्यक आहे परंतु असे होत नाही त्यामुळे त्याचा आजार वाढतो व नंतर कोरोनाचे सिम्टम आहेत असे सांगून त्याच्यावर कोरोनाचा उपचार करतात आणी त्यातच त्या रूग्णाचे निधन होते. यासाठी कोरोना आजारा व्यतिरिक्त असणारे इतर आजाराच्या रूग्णांना त्वरीत उपचार झाले पाहिजे. अशा रूग्णांना काही दवाखाने उपचारासाठी घेत नाही.
शिवाजी नगरमधील जम्बो हाॅस्पिटल आता चागंल्यापैकी सुधारणा होत आहे. काही रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत तर काही रूग्णांवर चांगले उपचार सुरू आहेत. परंतु याच्यामध्ये अधिक सुधारणा होणे गरजेचे आहे. तसेच बाणेर मधील डेडीकेअर हाॅस्पिटल ची मॅनेजमेंट बदलल्याने सुधारणा होत आहे परंतु अजुनही डाॅक्टर नर्सेस व टेक्निशन स्टाफ व इतर कर्मचारी उपलब्ध होत नाही. यामध्ये प्रशासनाने अधिक गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे.असेही विपक्ष नेत्या दिपाली प्रदीप धुमाळ यांनी यावेळी सांगितले.
विभागीय आयुक्त कार्यालयात आज अजितदादानी बैठक घेऊन आढावा घेतला. या प्रसंगी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी; महानगरपालिका आयुक्त, अति.आयुक्त,महापौर, व प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.अजितदादा यांनी ससुन रूग्णालयात काही तांत्रिक अडचणी आल्याने ससुन मध्ये रूग्ण घेत नाही परंतु आठ दिवसात या अडचणी सुटतील व पुर्ववत क्षमतेने ससून सुरू होईल असे अजितदादानी सांगितले. तसेच ज्या वरील तक्रारी अथवा त्रुटी निदर्शनास आणून दिल्या त्या त्वरीत प्रशासनाने गांभीर्य लक्षात घेऊन त्वरीत या अडचणी सुचवाव्यात अशा सुचना प्रशासनाला दिल्या.