पुणे-मुळशी धरणातील 5 टी.एम.सी. पाणी पुणे शहरासाठी मीळणेकामी आपले स्तरावरून निर्णय करण्यात यावा अशी मागणी मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्री, महसूलमंत्री, पालकमंत्री, नगरविकास सचिव, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, आयुक्त यांचे कडे महापालिकेतील कॉंग्रेसचे गट नेते आबा बागुल यांनी केली आहे
ते म्हणाले,’ पुण्यामध्ये शासनाच्या मालकीचे मुळशी धरण हे टाटा समूहाला महाराष्ट्र सरकारने (ब्रिटिश काळात) कराराने दिलेले आहे. या धरणाची पाण्याची एकूण क्षमता 23 टीएमसी आहे. आमच्याकडे उपलब्ध असलेल्या माहितीनुसार टाटा समूहाचा करारनामा संपुष्टात येवून 10 ते 15 वर्षे पेक्षा जास्त वर्षे झालेली आहेत. करारनामा संपुष्टात आल्यानंतरही मुळशी धरणाचा ताबा आजही टाटा समूहाकडे आहे. सबब मुळशी धरणाचा करारनामाच्या अटी व शर्ती तपासून टाटा समूहा कडून धरण ताब्यात घेणेची प्रक्रिया चालू करावी. तत्पूर्वी मुळशी धरणातील पुणे शहरासाठी 5 टीएमसी पाणी घेण्याची प्रक्रिया त्वरीत चालू करावी, ही शासनाकडे विनंती करत आहाेत.
पुणे शहराची लाेकसंख्या 89 लाखापर्यंत जाणार असा पुणे महानगरपालिकेनेच अंदाज बांधलेला असून त्यासाठी पाण्याची उपलब्धता करणेसाठी प्रयत्न हाेणे अत्यावश्यक आहे. पुणे शहराची वाढती लाेकसंख्या पाहता अपुरे पडणारे पाणी याचा विचार करता पुणे शहराला मुळशी धरणातून 5 टीएमसी पाणी उपलब्ध हाेणे अत्यंत गरजेचे आहे. हे पाणी उपलब्ध झाल्यास खडकवासला, पानशेत, वरसगाव धरणाचा ताण कमी हाेणार आहे. याबाबत आजपासून प्रयत्न चालू केल्यास 2 ते 3 वर्षात हे 5 टीएमसी पाणी प्रत्यक्षात मिळेल. याकामी सर्व कायदेशीर बाबी पूर्ण करणेसाठी स्वतंत्र यंत्रणा पुणे महानगरपालिका व शासन स्तरावर उभी करणे गरजेचे आहे.
पुणे महापालिकेच्या हददीत 11 गावांचा समावेश झाला असून त्यापुढे 5 किमी पर्यंत पिण्याचे पाणी देणे कायदयाने बंधनकारक आहे. तसेच पुण्यास पाणी स्वरूपात निसर्गाने भरभरून देणगी दिली असून त्याचा विनियाेग करणेसाठी पुणे महापालिकेच्या क्षेत्रात किमान पाच ठिकाणी कॅचमेट शाेधून त्याठिकाणी तळे तयार करणेबाबत आपले स्तरावरून पुणे मनपास आदेश व्हावेत. त्यामुळे वाहून जाणारे पाणी साठवण करून पुणे शहरासाठी वापरता येईल.
पिण्यासाठी पाणी देणे यास संविधानाप्राणे घटनेध्येच प्राधान्य क्रम आहे. त्यानंतर शेती, उदयाेग, वीज व इतर असा प्राधान्यक्रम आहे. परंतू मुळशी धरणातील पाण्यातून टाटा समूह वीजनिर्मिती करत आहे. घटनेत संविधानात नमूद केल्याप्राणे निसर्गाने दिलेल्या पाण्याचा वापर प्रथम पिण्यासाठी हाेणे गरजेचे असून वीजर्निितीसाठी अनेक नवनवीन उपाय आलेले आहेत. पाणी कृत्रिमरित्या निर्माण हाेवू शकत नाही. पाणी ही निसर्गाने दिलेली अमूल्य देणगी आहे.
तरी मुळशी धरणातील 5 टी.एम.सी. पाणी पुणे शहरासाठी मीळणेकामी आपले स्तरावरून निर्णय करण्यात यावा अशी मागणी मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्री, महसूलमंत्री, पालकमंत्री, नगरविकास सचिव, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, आयुक्त यांचे कडे करण्यात आली आहे