सहा वर्षानंतर,निवडणुकीच्या तोंडावर कामगार नेत्याला समजले : कंत्राटी कामगारांचे शोषण होते …..
पुणे- गेली सहा वर्षाहून जास्त काळ कामगार नेता म्हणून राष्ट्रीय पक्षाच्या कार्यालयात आपला ठिय्या ठाम मांडून बसलेल्या एका ‘तथाकथित’ कामगार नेत्याला महापालिका निवडणुका जवळ आल्यावर समजले आहे कि, पुणे महापालिकेतील कंत्राटी कामगारांचे शोषण होते आहे.आणि आता त्यामुळे कधी छोटी ,छोटी आंदोलने करत कधी प्रसिद्धी मिळवत यावर आपण जागृत असल्याचे दर्शवण्याचा कार्यक्रम सुरु केला आहे. याच पक्षाच्या एका नगरसेवकाने कंत्राटी म्हणून नेमणूक नसतानाही महापालिकेच्या मिळकत कर विभागात एकाला काहीही आधार नसताना तसेच ‘बस इथे कामावर ‘ सुरु कर काम , म्हणून तोतया नौकरी दिल्याचे अनेकांना ताहुक होते पण ‘माय मराठी ‘ ने याच विभागात स्ट्रिंग ऑपरेशन करत कॉंग्रेसच्या दोन वरिष्ठ नेत्यांच्या सहाय्याने या विभागात बोगस लोक कामगार म्हणून बसतात याचा पर्दाफाश केल्यावर पोलिसात त्या एका विरुद्ध गुन्हा तर दाखल झाला .पण पुढले सारे सोपस्कार गुंडाळून ठेवण्यात आले. कंत्राटी कामगार महापालिकेच्या विविध खात्यात नव्हे तर काही पदाधिकार्यांच्या कार्यालयात काम करत होते. ,एक ना एक दिवस आपल्याला इथे कायम नौकरी मिळेल या आशेने सारी पिळवणूक ,शोषण ते सहन करत होते याचा संपूर्ण नाहीच पण अत्यल्प अंशी आता निवडणुकीच्या तोंडावर कामगार नेत्याला साक्षात्कार होऊ लागल्याचे स्पष्ट झाले आहे.
विधी सल्लागार कार्यालयाकडे माहितीच नाही –
पुणे महापालिकेच्या मिळकत कर विभागात माय मराठीने दोन वरिष्ठ नगरसेवकांच्या सहाय्याने स्ट्रिंग ऑपरेशन करून बोगस कामगार खुर्चीवर बसून महापालिकेचा आर्थिक कारभार पाहत आहे हे रंगे हाथ पकडून दिल्याच्या घटनेला सुमारे ५ वर्षे उलटली . दुसर्या दिवशी महापालिकेने शिवाजीनगर पोलिसात तक्रार नोंदविली .फरार आरोपीला काही दिवसानंतर अटक झाली .पुढे मिळकतकर विभागप्रमुख शासकीय अधिकारी असल्याने पुण्यातून त्यांची बदली झाली . पण महापालिकेने पोलिसात दाखल केलेल्या या तक्रारीचे काय झाले ? हि केस महापालिकेच्या वतीने कोणी लढविली ? या केसचा निकाल लागला कि नाही ? लागला असेल तर काय लागला ? या प्रश्नांची उत्तरे महापालिकेच्या विधी सल्लागार कार्यालाकडे नाही . आम्हाला कहीही माहिती नाही , किंवा माहिती घेऊन सांगते .. अशा स्वरूपाचे उत्तर गेली वर्षभर विधी सल्लागार कार्यालय देत आहे.
कंत्राटी कामगारांचीच नाही तर बोगस कामगारांचीही पिळवणूक गेली ६ वर्षांपासून
कायम स्वरूपी कामगार ,अधिकारी भरती करायची नाही आणि निव्वळ कंत्राटी कामगार ठेकेदारांमार्फत भरती करून त्यांच्याकडून आपल्याला हवे तसे कामकाज करवून घेण्याची पद्धत गेली ६ वर्षे महापालिकेत राबविली जाते आहे.कंत्राटी कामगाराला १० हजाराच्या वर पगार हाथी येत नाही , किमान वेतन कायद्याची इथे पायमल्ली होते आहे . हे मुद्दे माय मराठी ने ६ वर्षे सातत्याने मांडले .पण तरीही कामगार नेते गप्पच का रहिले ? सुमारे २०0 कामगारांची नावे सादर करून त्याबाबत हि प्रश्न उपस्थित केले. पण नगरसेवक आणि प्रशासन यांचीच मिलीभगत असल्याने हा अंधार दूर करण्यास कोणीही पुढे आले नाही .निव्व ळ कंत्राटी च नाही तर ..असेच .. बस कर काम सुरु म्हणून बसविलेले अनेक (ज्यांना तोतया म्हणता येईल ,पण म्हणणे कठीण जाईल ) जण महापालिकेत काम करत आले . ज्यांना ना जॉईन लेटर,ना ओळखपत्र दिले होते, ज्यांना पगार खाते प्रमुख किंवा कोणी अधिकारी आपापल्या खिशातून करत होते .ज्यात संगणक ऑपरेटर चा हि सहभाग होता .अशा काही शे कामगारांनी एक ना एक दिवस आपल्याला इथेच कामावर घेतील म्हणून हि सारी नियमबाह्य पद्धती अंगिकारली आणि इथल्या कार्यपद्धती अनुसरण्यात धन्यता मानली .
कुलकर्णी नावाच्या तत्कालीन एका शासकीय अधिकार्याच्या अखत्यारीत त्याच्याच कार्यालयात बसलेला एक असाच बोगस कर्मचारी ‘माय मराठी ‘ ने भाजपच्या एका नगरसेवकाच्या मदतीने या अधिकार्याच्याच पुढ्यात उभा केला मात्र त्यावर तसूभरही कार्यवाही न करता हा कुलकर्णी ठम्म बसून राहिला , पुढे तो अधिकारी निलंबित झाला पण कर्मचारीमात्र तसाच राहीला.
बेरोजगारांना नियमबाह्य पद्धतीने वापरून घेणारी महापालिका अशीच झाली होती ओळख
या सर्व प्रकारांमुळे ‘ माय मराठी ने सातत्याने महापालिकेवर टीकास्त्र सोडले ,बेरोजगारांना अशा नियमबाह्य पद्धतीने वापरून घेऊन त्यांना तोतया बनवून त्यांचे आयुष्य खराब करण्याएवजी त्यांना सेवेत सामावून घ्या असेही सुचविले . पण तसे केले तर संबधितांचे उखळ पांढरे कसे होणार ? आणि नियमबाह्य कामे करायला कोणी कायम कर्मचारी कसा पुढे येणार ? या साऱ्या प्रश्नांमुळे आता महापालिकेतील आणि महापालिकेच्या सर्व कार्यालयातील कायम आणि कंत्राटीआणि अन्य कर्मचाऱ्यांची अचानक तपासणी केंद्रीय कर्मचारी आयोगाने केली पाहिजे अशी स्थिती आहे. बेरोजगार तरुणाईची पिळवणूक करणारी महापालिका असाच प्रवास गेली ६ वर्षे इथे सुरु होता. तत्कालीन मनसेच्या एक महिला नेत्या आणि सध्या मनसेचे मोठे नेते मानले जाणारे प्रस्थ यांच्याकडे या प्रकरणांची इथंभूत माहिती होती,अजूनही असेल. त्यांनी या अन्यायाविरोधात वेळोवेळी आंदोलनेही केली होती .