पुणे-जुन्नर तालुक्यातील वडगाव आनंद येथील रानमळा येथील एका शेतकऱ्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चिठ्ठी लिहून जन्मदिनाच्या शुभेच्छा देत आत्महत्या केली.आत्महत्येआधी या शेतकऱ्याने एक चिठ्ठी लिहिली. त्यात त्यांनी आपल्या यातना व्यक्त केल्या. पंतप्रधान नरेंद मोदी यांचा शेतीवर कंट्रोल नाही. रिझर्व बँक ऑफ इंडियाने फायनान्स करणाऱ्या कंपन्यांवर अनेक निर्बंध घातले आहेत. मात्र, तरीही या कंपन्यांची दादागिरी कमी होत नाही. याच कंपन्यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे या शेतकऱ्याने लिहिले आहे.फायनान्सवाले दमदाटी करतात. पतसंस्थावाले अपशब्द वापरतात. यामुळे आत्महत्या करत असल्याचे शेतकारी दशरथ केदारी यांनी चिठ्ठीत लिहिले आहे. ते शेतकरी अल्पभूधारक असून त्याने शनिवारी आत्महत्या केली.
दशरथ लक्ष्मण केदारी असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 17 सप्टेंबरला वाढदिवस झाला. एकीकडे त्यांच्या वाढदिवसानिमित्त तब्बल 94 कोटी रुपये खर्चून भारतात आणलेल्या चित्ते कुनो राष्ट्रीय उद्यानात सोडत होते. तर त्याच्याच दुसऱ्या दिवशी शेतकऱ्याने त्यांनाच शुभेच्छा देत आत्महत्या केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार केदारी हे अल्पभूधारक शेतकरी आहेत. त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात कर्ज होते. तसेच त्यांच्या शेतमालाला देखील बाजारभाव मिळत नव्हता. त्यात बँकेच्या अधिकाऱ्यांनी कर्जवसूलीसाठी त्यांच्या कडे तगादा लावला होता. तसेच त्यांना शिवीगाळ आणि दमदाटी देखील केली जात होती. यामुळे केदारी यांनी शनिवारी शेततळ्यात उडी मारून आत्महत्या केली.
केदारी यांनी चिट्ठीत नमूद केले आहे की, रिझर्व बँक ऑफ इंडियाने फायनान्स करणाऱ्या कंपन्यांवर अनेक निर्बंध घातले आहेत. मात्र, तरीही या कंपन्यांची दादागिरी कमी होत नाही. याच कंपन्यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करीत आहे.