पुणे- तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने घेतलेल्या त्रिसदस्यीय प्रभार रचना रद्द करुन आता 4 सदस्यांचा प्रभाग करण्याचा निर्णय शिंदे आणि फडणवीसांच्या सरकारनं घेतलाय. या निर्णयाला राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी विरोध केला आहे.
आगामी पालिका निवडणुका चार सदस्यीय प्रभाग पद्धतीनेच करण्याच्या राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयाच्या विराेधात पुणे राष्ट्रवादी काँग्रेस सर्वाेच्च न्यायालयात दाद मागणार आहे. राज्य सरकारचा निर्णय हा चुकीचा आणि स्वत:च्या पक्षाला फायदा हाेण्यासाठीच घेतला आहे. अशी टीका प्रशांत जगताप यांनी भाजप वर केली आहे.
राज्य सरकारनं घेतलेला निर्णय चुकीचा आहे, असं मत राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी व्यक्त केलंय. यामुळे निवडणुकांना पुन्हा सात ते आठ महिने उशीर होण्याची शक्यता आहे.
हा निर्णय घेण्याचा राज्य सरकारला जरी अधिकार असला तरी तो दुर्दैवी आहे. कारण पुन्हा प्रभागांची रचना करणं, पुन्हा आरक्षण काढणं, या सगळ्या प्रक्रियेला कमीत कमी 6 ते 8 महिन्याचा कालावधी लागेल. त्यामुळे नजिकच्या काळात या निवडणुका होतील असं वाटत नाही. हा निर्णय घेताना राज्य सरकारनं डोळ्यासमोर काय उद्दीष्ट ठेवलं हे जनतेला माहिती आहे. असे प्रशांत जगताप म्हणाले.