पुणे-वीस वीस आय ए एस अधिकारी असूनही पुण्यात अजूनही कोरोना नियंत्रणात येत नाही . शासकीय पातळीवरही व्यवस्थित समन्वय व्हायला हवा असे मत व्यक्त करीत काय करायचे ते करा पण सामन्य माणसाचे जनजीवन विस्कळीत होता कामा नये असे खासदार गिरीश बापट यांनी ‘पुण्यात जमाव बंदी’ बाबत लोकप्रतिनिधी म्हणून आपले मत व्यक्त करताना म्हटले आहे.
पुण्यामध्ये कोरोणाचा प्रादुर्भाव वाढत असताना वेगवेगळ्या पातळ्यांवर काय करावे असा प्रश्न आहे .मला असे वाटते कि प्रश्नांना सामोरे जायला हवे ,घाबरून चालणार नाही .तसा लॉकडाऊन तर आपण विचारच नाही करू शकत पण जमाव बंदी देखील ज्या भागात अति गर्दी होते, तिथे जमाव बंदी करावी ,पण जिथे दैनंदिन व्यवहार सुरळीत चालू आहे तिथले जनजीवन विस्कळीत करू नये .अॅॅम्ब्युलंस पासून औषधांपर्यंत. सगळ्या उपलब्धी लोकांच्या मनातील भीती घालवावी ,प्रबोधनाच्या माध्यमातून कोरोनावर मात होईल भीतीच्या माध्यमातून होणार नाही .फैलाव होऊ नये म्हणून जे करायचे ते करा ,पण तारतम्याने वागून करावे पण सरसकट जमावबंदी करावी असे मला वाटत नाही . वीस वीस आय ए एस अधिकारी असूनही पुण्यात अजूनही कोरोना नियंत्रणात येत नाही . शासकीय पातळीवरही व्यवस्थित समन्वय व्हायला हवा