‘मनमोहनसिंह यांच्या काळातील सर्वंकष प्रगती (इनक्ल्युसिव्ह ग्रोथ) चा विचार आणि योजना या अंदाजपत्रकात हरवल्या आहेत. उद्योग जगताला डोळ्यासमोर ठेवून अंदाजपत्रक तयार झाले आहे. ‘स्मार्ट सिटीज्’ चे ढोले वाजवले गेले होते पण उल्लेखही नाही आणि तरतुदही नाही. महिलांसाठी, त्यांच्या सुरक्षिततेसाठी अजून तरतूद अपेक्षित होती. तसेच शेतीप्रधान लोकसंख्येसाठी ठोस पावले उचलली गेली नाहीत हे ठळकपणे जाणवते.’, अशी प्रतिक्रिया राज्यसभा खासदार अॅड. वंदना चव्हाण यांनी दिली.