पुणे :
मकरंद अनासपुरे व नाना पाटेकर यांच्या ‘नाम फाऊंडेशन’ला ‘श्रीकृष्ण मित्र मंडळ ट्रस्ट’ व ‘हर्षल झगडे मित्र परिवारा’तर्फे दुष्काळग्रस्त शेतकर्यांसाठी 25 हजार रूपयांचा मदतनिधी देण्यात आला.
यावेळी श्रीकृष्ण मित्र मंडंळाचे प्रमुख कार्यकर्ते हर्षल झगडे, अभिषेक कवडे, गणेश पवार, तुषार पासलकर, विनायक पैलवान, मनोज वैरागकर, चिन्मय जगताप, अमित श्रीवास्तव, शुभम कुदळे व अजय नडगेरे उपस्थित होते.