पुणे :
व्यावसायभिमुख शिक्षणाला प्राधान्य देण्याबरोबर देशभरात दिल्या जाणाऱ्या तंत्रशिक्षणाची गुणवत्ता वाढविण्याच्या उद्देशाने नवी दिल्ली येथील “अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद’ (अखउढए) व “कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज’ (उखख) यांच्या संयुक्त विद्यमाने 2014 मध्ये केले गेलेल्या देशभरातील सर्व्हेक्षणात “वालचंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’ (सोलापूर) ला (यंदाच्या वर्षी “एआयसीटीई-सीआयआय इंडपॅक्ट’या नावाने) शासकीय अनुदानित, विद्यापीठ व विनाअनुदानित महाविद्यालय गटातून “मेकॅनिकल इंजिनिअरींग’ आणि “सिव्हील इंजिनिअरींग’ या दोन शाखांना “बेस्ट इंडस्ट्रीज-लिंक्ड् इन्स्टिट्यूट’ पुरस्कार मिळाला आहे.
अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद (अखउढए) व कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज (उखख) यांच्या वतीने 2014 च्या प्रक्रियेनंतर वालचंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये शिकविल्या जाणाऱ्या “सिव्हील इंजिनिअरींग’ आणि “मेकॅनिकल इंजिनिअरींग’ या विभागाला “बेस्ट इंडस्ट्रीज-लिंक्ड् इन्स्टिट्यूट’ ऍवॉर्ड मिळाला आहे. तसेच इन्स्टिट्यूटमधील “कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरींग’, “इन्फरमेशन टेक्नॉलॉजी’, “इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरींग’, “इलेक्ट्रॉनिक्स ऍण्ड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरींग’ या शाखांना ग्रीन झोन दर्जा मिळाले आहे. ग्रेटर, नोएडा, नवी दिल्ली येथे त्याची घोषणा “नॉलेज एक्स्पो’च्या कार्यक्रमात करून केंद्रीय मानव संसाधन विकासमंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. “डब्ल्यूआयटी’चे प्राचार्य, डॉ. शशिकांत हलकुडे यांनी प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह हा पुरस्कार स्वीकारला.
दोन शाखांना पुरस्कार मिळविणारे महाराष्ट्रातील “डब्ल्यूआयटी’ हे एकमेव अभियांत्रिकी महाविद्यालय आहे. “आयआयटी’, “आयआयएम’, “एनआयटी’ आणि “आयआयआयटी’ यांच्या सहभागामुळे या पुरस्काराची प्रतिष्ठा वाढली आहे. “डब्ल्यूआयटी’ने मागील वर्षाप्रमाणे यंदाही हा पुरस्कार स्वत:कडे राखण्यात यंदा आणखी एका नव्या शाखेला पुरस्कार मिळविण्यात यशस्वी ठरले आहे. या पुरस्काराने राष्ट्रीय नकाशावर अभियांत्रिकी शिक्षणात “डब्ल्यूआयटी’ चा पुन्हा एकदा ठसा उमटविला आहे.
“डब्ल्यूआयटी’तील शैक्षणिकपद्धती व वातावरण तसेच तज्ज्ञ प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी वर्ग यांचे योगदान या पुरस्कारासाठी मोलाचे ठरले आहे. राष्ट्रीय व बहुराष्ट्रीय कंपन्यांना कॅम्पस इंटरव्ह्यूच्या माध्यमातून कुशल व सक्षम मनुष्यबळ विद्यार्थ्यांच्या रूपाने उपलब्ध करून देण्याच्या पद्धतीचा गौरव या पुरस्काराने झाला आहे.
2014 च्या सर्व्हेक्षणात भारतातील 814 विविध महाविद्यालयातील 2 हजार 744 शाखांनी सहभाग घेतला होता. 2013 च्या तुलनेत हे 125 टक्क्यांनी वाढले आहे. घोषित पुरस्कारामध्ये “डब्ल्यूआयटी’सह इतर 9 अभियांत्रिकी व 3 तंत्रनिकेतन आणि व्यवस्थापन शास्त्र, जैवतंत्रज्ञान व औषध निर्माण शास्त्र विभागाचा समावेश होता.
2013 च्या सर्व्हेक्षणामध्ये आयआयटी, आयआयएम, एनआयटी आणि आयआयआयटी या संस्था सहभागी नव्हत्या. परंतु 2014 च्या सर्व्हेक्षणात या सगळ्या उच्चमत संस्था सहभागी होऊनही वालचंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीने बाजी मारली आहे. त्यामुळे या पुरस्काराची उंची अधिक वाढली आहे. संस्थेच्या या यशस्वी वाटचालीसाठी ऐल्लक पन्नालाल दिगंबर जैन पाठशालेचे मानद सचिव डॉ. रणजित गांधी, विश्वस्त भूषण शहा, पृथ्वीराज गांधी, प्राचार्य, डॉ. शशिकांत हलकुडे यांचे योग्य मार्गदर्शन मिळत आहे.