मानव जातीचे कल्याण करतो तोच पुरुषार्थ :डॉ शंकर अभ्यंकर
उद्यम गौरव पुरस्कार पराग गाडगीळ,प्रदीप मराठे यांना तर सेवा गौरव पुरस्कार डॉ राजा दांडेकर ,विजय फळणीकर यांना प्रदान
पुणे :
‘मागणी तसा पुरवठा ‘ हे तत्वाने कशाचाही पुरवठा करून नफा मिळवणे , राक्षसी महत्वाकांक्षा ठेवून नफ्यासाठी ग्राहकांची पिळवणूक करणे चूक असून भारतीय नितीशास्त्राप्रमाणे सात्विक व्यावसायिक व्हावे,सचोटीने व्यवसाय करावा . कारण जास्तीत जास्त मानव जातीचे कल्याण करतो तोच पुरुषार्थ असतो ‘ असे प्रतिपादन रविवारी सकाळी संत साहित्याचे अभ्यासक डॉ शंकर अभ्यंकर यांनी केले .
शेठ चिमणलाल गोविंददास मेमेओरिअल ट्रष्ट च्या वतीने देण्यात येणाऱ्या उद्यम गौरव आणि सेवा गौरव पुरस्कार उद्योजक पराग गाडगीळ ,प्रदीप मराठे यांना तर सेवा गौरव पुरस्कार डॉ राजा दांडेकर ,विजय फळणीकर यांना शंकर अभ्यंकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले . त्यावेळी डॉ अभ्यंकर बोलत होते सचोटीने व्यापार करून मानदंड निर्माण करणारे उद्योजक स्व . चिमणलाल गोविंद दास गुजराथी यांच्या स्मृती प्रित्यर्थ हे पुरस्कार दिले जातात
रविवारी सकाळी मयुर कॉलोनी कोथरूड येथील बाल शिक्षण मंदिर सभागृहात हा कार्यक्रम झाला . स्मृतिचिन्ह ,धनादेश ,पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे .
डॉ शंकर अभ्यंकर म्हणाले ,’व्यापारी व्यवस्था ही अर्थ व्यवस्था आणि राष्ट्र उभारणी साठी आवश्यक आहे . स्पर्धेच्या युगात उभे राहण्यासाठी व्यापारी ,व्यावसायिक ,उद्योजकांनी तडजोडी करू नयेत . बारा बलुतेदारांना बरोबर ठेवावे . ‘अर्थ ‘ हे मानवी जीवनात प्रधान असले तरी धनसंपदा वाढविण्यासाठी सद्गुण कमी होवू देवू नयेत आणि पाय जमिनीवर ठेवावेत . सचोटीने उत्तम धन संचय केल्यानंतर समाजोपयोगी कामे करावीत . स्व . चिमणलाल गुजराथी यांचे कार्य त्यादृष्टीने पथदर्शक आहे ‘
मागणी तसा पुरवठा ‘ हे तत्वाने कशाचाही पुरवठा करून नफा मिळवणे , राक्षसी महत्वाकांक्षा ठेवून नफ्यासाठी ग्राहकांची पिळवणूक करणे चूक असून भारतीय नितीशास्त्राप्रमाणे सात्विक व्यावसायिक व्हावे . कारण जास्तीत जास्त मानव जातीचे कल्याण करतो तोच पुरुषार्थ असतो . साधने शुद्ध ठेवावीत ,प्रयत्न प्रामाणिक करावेत मग दैवही साथ देते ‘ असे ही ते म्हणाले
सत्कारार्थींच्या वतीने बोलताना विजय फळणीकर म्हणाले ,’ चांगले काम लोकांच्या पाठींब्यावर आणि त्यांच्या पैशातून उभे राहते . त्यामुळे ते चांगले चालते आहे ना हे पाहणेही लोकांची जबाबदारी आहे ‘
शाहीर होनराज मावळे यांनी चिमणलाल गुजराथी यांच्या जीवनावर पोवाडा सादर केला
मोहनराव गुजराथी यांनी प्रास्ताविक केले . डॉ आदिती गुजराथी ,प्रा . नलिनी गुजराथी यांनी सूत्रसंचालन केले . कन्हय्यालाल गुजराथी यांनी आभार मानले
यावेळी डॉ सतीश देसाई ,ज्ञान प्रबोधिनीचे संचालक डॉ गिरीश बापट ,वालचंद संचेती ,प्रा . राम डीम्बळे ,जयंत गुजराथी ,सुभाष देवी , प्रा सुभाष देशपांडे ,प्रवीण चोरबेले उपस्थित होते
पुरस्कार परीक्षक समितीचे सदस्य डॉ गिरीश बापट ,मल्हार अरणकल्ले यांचा सत्कार करण्यात आला